नेवेद्य खरोखरच देव खातो का ?  .... याविषयी माझे विचार 

03:58:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा भगवंत एखाद्याचा जसा भाव तसा त्याला पावतो. 


जर आपल्याला वाटत असेल की "ही नुसती भगवंताची मूर्ती आहे, ह्यात थोडीच देव राहातो?", तर देव त्यासाठी त्या मूर्तीत कसा बरे असू शकेल? त्याचप्रमाणे जर एखाद्याने "ही नुसती मूर्ती नसून हा प्रत्यक्ष देवच आहे" या भावनेने आपण नैवेद्य अर्पण करत असू तर त्या क्षणी देव तिथे त्या मूर्तीत प्रत्यक्ष येतोच येतो. 


वरील उदाहरणाप्रमाणेच "हा नैवेद्य देव कसा काय खाईल?" असा मनात विचार आला म्हणजेच आपण समजून जावे की "हा देव नसून ही केवळ देवाची मूर्ती आहे" असाच आपला भाव आहे, आणि देव त्यानुसारच फळ देणार. याउलट "देवा मी प्रेमाने तुला मनापासून हा नैवेद्य अर्पण करतोय, पोटभर खा हा ..." असा जर भाव असेल, तर देव तो नैवेद्य संपवतोच आणि तो प्रसन्न होऊन त्याला तृप्तीचा ढेकर येतोच. 


मग कुणी बुद्धीभेद करणारा म्हणेल की बघा, दाखवलेला नैवेद्य तर आहे तसाच आहे, कुठे संपलाय ?  पण हा नैवेद्य म्हणून काय खातो, हे आपण लक्षात घेतले तर साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.   


हा भक्तीचा भुकेला 
ह्याला नैवेद्य प्रेमाचा... 


नैवेद्य अर्पण करताना ज्या भक्तीभावाने आणि प्रेमाने त्या देवाला आळवतो आणि आठवतो तो भाव आणि प्रेमच हा देव ग्रहण करतो.

एखादवेळी हा देव अगदी त्या व्यक्तीने देवाला अर्पण केलेले नैवेद्याचे ताट संपूर्ण ग्रहण करून, किंवा थोडे खाऊन एक सुंदर अनुभवही देऊ शकेल. बाकीचे लोक ह्याला चमत्कार म्हणू शकतील, पण ही प्रेमाची जादू आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. 


बापू कुबेर प्रीतीचा... 


हा भक्तिप्रेमाचा आणि भावाचाच हावरा आहे. एवढे जरी कळले तरी सगळ्या प्रश्नांची आणि चमत्कारांची उत्तरे मिळतात.          

0 comments:

संत जनाबाई

11:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments

संत  जनाबाई  निधन  (१५ मे ,१३५०) 


गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका शूद्र  जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.

अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. 
नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. 

वारकरी सांप्रदायामध्ये संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या .त्यांनी जवळपास ३५० रचना केल्या त्या पैकी काही नामदेवांच्या समजल्या जातात.त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असुदे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्माला आलेल्या जीवाला पांडुरंगाची व संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे.

जनाबाईने लिहिलेल्या अभंगांपैकी काही अभंग सोबत दिले आहेत. जनाबाई थोरच आणि ते  गाऊन त्यांना  चिरंतन करणारे गायक / गायिका देखील तेव्हडेच तोलामोलाचे .
भारतरत्न पं.भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी,किशोरी आमोणकर,आशा  भोसले,अनुराधा  पौडवाल यांनी संत जनाबाईंचे  अभंग  गाऊन ते चिरंजीव केले गायलेल्या अभंगांपैकी  थोडे सोबत देतो आहे.
१) संत भार पंढरीत 
२) दळीता कांडिता   
३) ज्याचा सखा हरी 
४) जनी म्हणे पांडुरंगा  
५) धरिला पंढरीचा चोर  .

वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेल्या संत परंपरेतील थोर जनाबाईंना विनम्र अभिवादन.

प्रसाद जोग.सांगली.

0 comments:

प्लेझंट सरप्राईज ...

11:23:00 Nandan Bhalwankar 0 Comments

प्लेझंट सरप्राईज ... 

गुरुवार, आपला श्री हरिगुरुग्रामला जायचा वार. ऑनलाईन उपासना सुरू होती. नेहेमीप्रमाणे आरती साईबाबा झाल्यावर दर्शन सुरू होणार असे वाटले. कारण तसेच नॉर्मल रूटीन गेले कित्येक महिने आपण सारेच अनुभवत होतो. 

पण .... अचानक कानावर "आय लव्ह यू माय डॅड" ची धून वाजली आणि अंगावर अक्षरश: रोमांच आले.. एकदम सारे वातावरण पालटले. नंतरची प्रदक्षिणा म्हणजे "सोने पे सुहागा" च ! आज साईचरित्रातील अध्याय २ आठवला.  

कधींऐकिलीनाहींदेखिली
मूर्तिपाहूनिद्दष्टिनिवाली 
तहानभूकसारीहरपली 
तटस्थठेलींइंद्रियें१३९॥

साईदर्शनलाभघडला
माझियामनींचाविकल्पझडला 
वरीसाईसमागमघडला 
परमप्रकटलाआनंद१४४॥

खरोखर आज मला जाणवलं, हेमाडपंतांनी जेव्हा साईनाथांना पाहिलं असेल तेव्हा त्यांना काय झालं असेल ! खूपच छान अनुभव होता तो ! 

इस बगिया का हर फूल खिला 
अनिरुद्ध तेरे आने से .... 

 
- नंदनसिंह भालवणकर, 
दादर उपासना केंद्र  
  

0 comments:

लेख आणि कविता

Poem on Nandai - Aatmabal

04:11:00 Nandan Bhalwankar 0 Comments



0 comments: