श्रीमहादुर्गेश्वर प्रपत्ती आणि Lockdown

04:14:00 Nandan Bhalwankar 0 Comments

श्रावण सोमवार, प्रपत्ती चा वार. पण कोरोना आणि लॉकडाऊन. मग काय कारायचं ? तसे बघायला गेलं तर पुरुषाना घरातच राहून प्रपत्ती करायची असते. पण सामानाचे काय ?

ह्या बापूच्या राज्यात हे प्रश्न उद्भवतच नाहीत.  

जिथे अनिरुद्ध राहे 
तिथे ना अभाव ... 

यातून काही गोष्टी जाणवल्या, ज्यासाठी आपल्या लाडक्या डॅड ला मनापासून अंबज्ञ म्हंटले.   
  
१) बापूकडे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. कठोर नियम नाहीत. प्रपत्ती ही नेहेमीप्रमाणेच व्हायला हवी, नाहीतर करता येणार नाही असे नाही. प्रपत्ती करता साहित्याचे जे पर्याय दिले ते ही अगदी सहज उपलब्ध होतील असे. असे नियम वाकवण्याची क्षमता आणि ताकद ही केवळ बापूकडेच असू शकते.

२) कर्मकांडाला स्थान नाही. भाव महत्वाचा.   

३) ह्या बापूकडे नियम फक्त प्रेमाचा. 

प्रेम देई प्रेम घेई 
हाच एकला करार 

४) ह्या बापू आई आणि मामाचे आपल्यावर अफाट प्रेम आहे. केवळ ही परमात्मत्रयीच आपले मन समजू शकते आणि मनातल्या शंका जाणू शकते. प्रपत्ती करण्याची इच्छा असूनही प्रपत्ती करता येत नाही असे व्हायला नको म्हणून डॅड ने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले.     

५) बाहेर कितीही कठीण परिस्थिती असली तरीही हा बापू नावाप्रमाणेच unstoppable. आपणही त्याचीच लेकरे. सभोवतालच्या कठीण परिस्थितीतही प्रत्येकाने प्रपत्ती केली. किंबहुना डॅड मुळेच आपण प्रत्येक जण प्रपत्ती करू शकलो.   

हा बापू आपल्या प्रत्येकाचे जीवन सुंदर व्हावे यासाठीच कायम झटत आला आहे, झटतोय. सतत काही ना काही देतच आला आहे आणि आपल्यासाठी नियम वाकवत आला आहे. 

बस चाहता है वो मेरी खुशी 
वो सारी बलाये लेता है 
कभी चाहता नाही मुझसे कुछ भी 
बस प्यार से देता रेहेता है .... 

त्यासाठी त्या बापूला मनापासून अंबज्ञ म्हणूया. 

नंदनसिंह भालवणकर 
दादर उपासना केंद्र 

0 comments:

जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो.

07:18:00 Nandan Bhalwankar 0 Comments

एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. 

वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. 

अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.

या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. 

मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. 

पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. 

वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.

तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.

अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.

सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. 

आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. 

ते घेवून तो घरी पोहोचला. 

त्याच्या घरात एक जुने मडके होते. 

त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. 

चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.

अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. 

दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. 

त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. 

वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.

तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. 

मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. 

माणिक पाण्यात पडले.

माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.

चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.

अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.

सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. 

आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.

आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. 

श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.

अर्जुन म्हणाला "प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार?"

हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.

तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? 

ही देवाची कसली कृपा?

चालत असतांना त्याची नजर एका मासेमा-यावर गेली. 

त्याच्या जाळ्यात एक
छोटा मासा तडफडत होता. 

माणसाने विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.

सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. 

त्याला आपल्या कमंडलूत घेतले. 

त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.

प्रभूची लीला पाहा.... 

माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. 

निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, 

माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता.

तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला "सापडला, सापडला"

नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या.

त्याने माणसाला "सापडला सापडला" असे ओरडताना पाहिले. 

चोर घाबरला. 

चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. 

घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला.

हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. 

अर्जुन म्हणाला "जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले"

श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. 

जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला 

पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. 

म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, 

दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. 

आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो".

0 comments:

विड्याच्या पानाच्या उत्पति कथा

10:55:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 विड्याच्या पानाच्या उत्पति कथा 🍃

🍃 समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले.भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.✍🏻

🍃विड्याची पाने महत्व🍃

🍃 या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.✍🏻

🍃विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" सहवास असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या मधोमध "सरस्वती देवीचा" वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे "महाविष्णूचा" वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या मागीलबाजूस "चंद्रदेवता" वास
असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मधे "परमेश्वरा" चा वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाखाली "मृत्युदेवते"चा वास असतो.
या कारणाने ताम्बूलसेवन करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या देठात "अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी" राहतात.म्हणून पान
 सेवन करतांना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी ने.✍🏻

🍃 विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.
यासर्व देवतांचा विडयाच्या पानामधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोण त्याही कारणे विडयाची पाने घरा बाहेर जाऊ देऊ नयेत.
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत .✍🏻

0 comments:

लेकीसाठी वैकुंठातुन

08:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments


भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नामजप करत स्नान करून विठ्ठलाची पुजा झाली.तुळसीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईने जोरानं हाक दिली.
काही काळजी आहे का संसाराची?पोरींची?तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे. महाराज शांतपणे म्हणाले,आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होत.योग्य वेळ येवू द्यावी लागते.परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एकदिवशी जवळच यलवडी नावाचं गाव होतं. तिथे मुलगा पाहण्यासाठी गेले.तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहुन त्यांना खुप आनंद झाला. आणि महाराजांची मुलगी भागिरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपल जिवन परिपूर्ण झालं, संतकुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना अत्त्यानंद झाला. 
अखेर लग्न झालं.भागिरथी महाराजांच्या गळ्यात पडून रडू लागली. महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला म्हणाले, नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तु तुकाराम महाराजाची मुलगी आहे. भागिरथी नांदायला सासरी गेली. इकडे महाराजांच जीवन पुन्हा पुर्ववत सुरु झालं.भजन किर्तन नामस्मरण नित्य सेवा सुरु झाली. 
भागिरथीचं यलवडी गाव जवळच होतं पण येणंजाणं नव्हतं.देहुची माळीण भाजी विकायला यलवडीला जायची. राञी देहुमध्ये झालेलं आपल्या बापाचं,तुकाराम महाराजांच किर्तन ऐकण्यासाठी भागिरथी माळीणबाईची आतुरतेने वाट पाहायची.महाराजांच किर्तन, उपदेश ऐकून भागिरथीचे डोळे बापाच्या आठवणीनं भरून यायचे.माळीणबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं,महाराजाचं रोज दर्शन होतय या भावनेनं भागिरथी कृतकृत्य व्हायची.
अखेर तो दिवस आला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा.फाल्गुन वैद्य द्वितीया, सोमवार चा दिवस होता. प्रथमप्रहर,प्रात:काळ.बीजेच्या दिवशी शेवटचं किर्तन केलं. गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला.भागिरथी ला सांगाव,पण तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही.म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. देहु गावचं रत्नं गेल.
देहु गाव शोकसागरात बुडून गेल.सर्व निश्चल बसलेले.कुणाच कशात लक्ष लागत नाही.
पण शेवटी पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीणबाई यलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली. आणि जड पाऊलाने भागिरथीच्या दारात पोहोचली. बरेच दिवस माळीणबाई का आली नाही?माळीणबाई तुझा चेहरा का उतरला?असा प्रश्न भागिरथीने माळीणबाईला विचारला.जड अंतकरणानं माळीणबाई म्हणाली,भागिरथी तुझे बाबा माझे गुरू,जगतगुरू तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदेह वैकुंठाला गेले.
आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागिरथी धायमोकलुन रडु लागली.परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाहीत या विचाराणं भागीरथीनं तुकाराम तुकाराम नामजप सुरू केला.आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकुन तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले.नारायणाची परवानगी घेऊन भुतलावरच कार्य पुर्ण करण्यासाठी महाराज भागिरथीच्या घरी आले.
भागिरथी असा आवाज दिला.वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकुन भागिरथीने धावत येवून तुकाराम महाराजांना कडकडुन मिठी मारली,आनंदाश्रु घळघळ वाहु लागले.भागिरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती ञास करून घेतलास.तशी भागिरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय?कुणासाठी जगावं?तुकाराम महाराजांनी भागिरथीच्या तोंडावरून हात फिरवला.भागिरथी म्हणाली,बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोड जेवन करते.महाराज म्हणाले भागिरथी मी आता न जेवणा-या गावी गेलो.आपल्या भागिरथीला मायेनं जवळ घेतलं आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत,परत हाक मारू नको अशी विनंती केली.तशी भागिरथी म्हणाली, बाबा तुम्ही गेलाय अस वाटु देऊ नका,मी हाक मारणार नाही.भागिरथीला आशिर्वाद दिला.
भागिरथीच जिवन परिपूर्ण झालं.हे बाप-लेकीच अलौकिक नातं आहे.मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते.बाप आपलं दु:ख आईच्या ह्रदयासमान लेकीला सांगुन मन हालक करत असतो.जगतगुरू तुकाराम महाराज आणि भागिरथीचं हे नातं बाप लेकीच्या अलौकिक नात्याचं ह्रदयस्पर्शी उदाहरण आहे.म्हणून अस म्हणतात कि बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत,कारण एका *लेकीसाठी* एका बापालाही *वैकुंठहुन* यावा लागली होत!!

0 comments:

निष्ठा

08:28:00 Nandan Bhalwankar 0 Comments


जनाबाईचे अभंग दूर दूर पर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपूरास गेले. तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे त्यांना समजले. त्या दोघींच्या मध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता, गोवऱ्या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.

कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले अन मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, "इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का ?"

त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -"ही काय, हीच की जनी ! चोरटी ! माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करत्येय ! अन वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय."

त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्का बसला कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. 

तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले.

त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की , "तूच जनी आहेस का ?"
यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली, "होय बाबा मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा ?". 

तिच्या या उत्तराने अन तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते.

मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळ आले. ती कबीरांना म्हणाली, "हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोवऱ्या निवडून वेचून दया. तुमी एव्हढं काम करा अन मग हिथून जावा. "

आता गोवऱ्या सारख्याच दिसतात, शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, "त्यात काय इतका विचार करायचा ? अगदी सोप्पं काम आहे. "

आता कबीरजी चकित झाले होते. सारख्या दिसणारया शेणाच्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकते किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली.
कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, " अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा अन त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ' *विठ्ठल,विठ्ठल'* आवाज येईल ती गोवरी माझी. अन ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची !"

जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलुन आला अन त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.

कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या. गोवऱ्या उचलून कानी लावल्या अन काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून ' *विठ्ठल विठ्ठल'* असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही, 'आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वसतो आहे' हे त्यांच्या लक्षात आलं. कबीरांनी सारया गोवऱ्यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोवऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन वर जनाईला ती खोटे ठरवत होती.

गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते. जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, "या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का ? एकदम साधी गोष्ट आहे. मी ह्या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच ह्या गोवऱ्यात सुद्धा असतो !"
कबीर चकित होऊन जनाबाईचे बोलणे ऐकत राहिले अन मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.

*एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी ह्यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे.* *भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.*

0 comments:

नेवेद्य खरोखरच देव खातो का ?  .... याविषयी माझे विचार 

03:58:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा भगवंत एखाद्याचा जसा भाव तसा त्याला पावतो. 


जर आपल्याला वाटत असेल की "ही नुसती भगवंताची मूर्ती आहे, ह्यात थोडीच देव राहातो?", तर देव त्यासाठी त्या मूर्तीत कसा बरे असू शकेल? त्याचप्रमाणे जर एखाद्याने "ही नुसती मूर्ती नसून हा प्रत्यक्ष देवच आहे" या भावनेने आपण नैवेद्य अर्पण करत असू तर त्या क्षणी देव तिथे त्या मूर्तीत प्रत्यक्ष येतोच येतो. 


वरील उदाहरणाप्रमाणेच "हा नैवेद्य देव कसा काय खाईल?" असा मनात विचार आला म्हणजेच आपण समजून जावे की "हा देव नसून ही केवळ देवाची मूर्ती आहे" असाच आपला भाव आहे, आणि देव त्यानुसारच फळ देणार. याउलट "देवा मी प्रेमाने तुला मनापासून हा नैवेद्य अर्पण करतोय, पोटभर खा हा ..." असा जर भाव असेल, तर देव तो नैवेद्य संपवतोच आणि तो प्रसन्न होऊन त्याला तृप्तीचा ढेकर येतोच. 


मग कुणी बुद्धीभेद करणारा म्हणेल की बघा, दाखवलेला नैवेद्य तर आहे तसाच आहे, कुठे संपलाय ?  पण हा नैवेद्य म्हणून काय खातो, हे आपण लक्षात घेतले तर साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.   


हा भक्तीचा भुकेला 
ह्याला नैवेद्य प्रेमाचा... 


नैवेद्य अर्पण करताना ज्या भक्तीभावाने आणि प्रेमाने त्या देवाला आळवतो आणि आठवतो तो भाव आणि प्रेमच हा देव ग्रहण करतो.

एखादवेळी हा देव अगदी त्या व्यक्तीने देवाला अर्पण केलेले नैवेद्याचे ताट संपूर्ण ग्रहण करून, किंवा थोडे खाऊन एक सुंदर अनुभवही देऊ शकेल. बाकीचे लोक ह्याला चमत्कार म्हणू शकतील, पण ही प्रेमाची जादू आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवे. 


बापू कुबेर प्रीतीचा... 


हा भक्तिप्रेमाचा आणि भावाचाच हावरा आहे. एवढे जरी कळले तरी सगळ्या प्रश्नांची आणि चमत्कारांची उत्तरे मिळतात.          

0 comments:

संत जनाबाई

11:29:00 Nandan Bhalwankar 0 Comments

संत  जनाबाई  निधन  (१५ मे ,१३५०) 


गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका शूद्र  जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.

अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. 
नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. 

वारकरी सांप्रदायामध्ये संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या .त्यांनी जवळपास ३५० रचना केल्या त्या पैकी काही नामदेवांच्या समजल्या जातात.त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असुदे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्माला आलेल्या जीवाला पांडुरंगाची व संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे.

जनाबाईने लिहिलेल्या अभंगांपैकी काही अभंग सोबत दिले आहेत. जनाबाई थोरच आणि ते  गाऊन त्यांना  चिरंतन करणारे गायक / गायिका देखील तेव्हडेच तोलामोलाचे .
भारतरत्न पं.भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी,किशोरी आमोणकर,आशा  भोसले,अनुराधा  पौडवाल यांनी संत जनाबाईंचे  अभंग  गाऊन ते चिरंजीव केले गायलेल्या अभंगांपैकी  थोडे सोबत देतो आहे.
१) संत भार पंढरीत 
२) दळीता कांडिता   
३) ज्याचा सखा हरी 
४) जनी म्हणे पांडुरंगा  
५) धरिला पंढरीचा चोर  .

वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेल्या संत परंपरेतील थोर जनाबाईंना विनम्र अभिवादन.

प्रसाद जोग.सांगली.

0 comments:

प्लेझंट सरप्राईज ...

11:23:00 Nandan Bhalwankar 0 Comments

प्लेझंट सरप्राईज ... 

गुरुवार, आपला श्री हरिगुरुग्रामला जायचा वार. ऑनलाईन उपासना सुरू होती. नेहेमीप्रमाणे आरती साईबाबा झाल्यावर दर्शन सुरू होणार असे वाटले. कारण तसेच नॉर्मल रूटीन गेले कित्येक महिने आपण सारेच अनुभवत होतो. 

पण .... अचानक कानावर "आय लव्ह यू माय डॅड" ची धून वाजली आणि अंगावर अक्षरश: रोमांच आले.. एकदम सारे वातावरण पालटले. नंतरची प्रदक्षिणा म्हणजे "सोने पे सुहागा" च ! आज साईचरित्रातील अध्याय २ आठवला.  

कधींऐकिलीनाहींदेखिली
मूर्तिपाहूनिद्दष्टिनिवाली 
तहानभूकसारीहरपली 
तटस्थठेलींइंद्रियें१३९॥

साईदर्शनलाभघडला
माझियामनींचाविकल्पझडला 
वरीसाईसमागमघडला 
परमप्रकटलाआनंद१४४॥

खरोखर आज मला जाणवलं, हेमाडपंतांनी जेव्हा साईनाथांना पाहिलं असेल तेव्हा त्यांना काय झालं असेल ! खूपच छान अनुभव होता तो ! 

इस बगिया का हर फूल खिला 
अनिरुद्ध तेरे आने से .... 

 
- नंदनसिंह भालवणकर, 
दादर उपासना केंद्र  
  

0 comments:

लेख आणि कविता

Poem on Nandai - Aatmabal

04:11:00 Nandan Bhalwankar 0 Comments



0 comments:

लेख आणि कविता

Aniruddha TV = लेकरांसाठी धावत येणारा माझा बापू

08:04:00 Nandan Bhalwankar 0 Comments



Aniruddha TV = लेकरांसाठी धावत येणारा माझा बापू




कधी कसा तो कुठूनही 
येईलच तो अवचित 
वासरांसाठी प्रेमे जशी 
धेनु येई हो हंबरीत... 

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकालाच एक आधार हवा आहे. आणि तो बापूच. बापूला बघावं, त्याला न्याहाळावं  असे आपल्या प्रत्येकालाच वाटत आहे.. आणि येस... बापू अनिरुद्ध टीव्ही च्या माध्यमात सर्वांपर्यंत पोचलाच..           

मज न लागे गाडीघोडी । 
विमान अथवा आगिनगाडी । 
हांक मारी जो मज आवडी । 
प्रकटें मी ते घडी अविलंबें ।।
(॥साईचरित्र अध्याय ४०, ओवी ३२॥)

मुळात हा स्वतः:च 'अनिरुद्ध' आहे. ह्याला कोण बरे रोखणार आणि रोखू शकणार! हा प्रेमाखातर धावत येतोच! 

तुम्ही कोणी कुठेंही असा । 
भावें मजपुढें पसरितां पसा । 
मी तुमचिया भावासरिसा । 
रात्रंदिसा उभाच ।।
(॥साईचरित्र अध्याय १५, ओवी ६७॥)  

बापू आपल्याला प्रत्येक वेळी आधार देत होता, देतोय आणि देतच राहील. आजच्या कोरोना व्हायरस च्या भीतीच्या वातावरणातील आपला आधार म्हणजे ही उपासनाच. हीच आपली लस आणि उपाय. 

अनिरुद्ध टीव्ही वरची रोजची उपासना करून मनाला एक प्रकारचा आधार वाटतो, आपला डॅड सतत आपल्या जवळच आहे हा विचार एक वेगळ्याच प्रकारचे सुख देऊन जातो. 

बाबांचें ऐका उत्तर । 
‘माझिया प्रवेशा नलगे दार । 
नाहीं मज आकार ना विस्तार । 
वसें निरंतर सर्वत्र ॥१९९॥ 
(॥साईचरित्र अध्याय २८, ओवी १९९॥) 

टाकूनियां मजवरी भार । 
मीनला जो मज साचार । 
तयाचे सर्व शरीरव्यापार । 
मी सूत्रधार चालवीं” ॥२००॥ 
(॥साईचरित्र अध्याय २८, ओवी २००॥) 

 आता कशाला चिंता करायची? नाही का? 



- नंदनसिंह भालवणकर, 
दादर उपासना केंद्र

0 comments:

लेख आणि कविता

Easy Healthy Rawa Cake Recipe

07:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments


रवा केक तयार करण्याची सोपी पद्धत

1. रवा = 1वाटी
2. कणिक = 1वाटी
3. दूध = 1वाटी

4. दही = 1वाटी
5. तूप = 1वाटी
*6. Dextrose* = 2 वाटी
7. केशर = 1 चिमूट 

*No baking powder*

सगळे हेल्दी... 😃








0 comments:

लेख आणि कविता

Lockdown 2020 - Different food items tried at Home

07:46:00 Nandan Bhalwankar 0 Comments






0 comments:

लेख आणि कविता

Lockdown 2020 - Grow Trees

07:38:00 Nandan Bhalwankar 0 Comments



#TreePlantation #GrowTrees #Tree

0 comments: