विड्याच्या पानाच्या उत्पति कथा

10:55:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 विड्याच्या पानाच्या उत्पति कथा 🍃

🍃 समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले.भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली.✍🏻

🍃विड्याची पाने महत्व🍃

🍃 या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.✍🏻

🍃विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" सहवास असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या मधोमध "सरस्वती देवीचा" वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे "महाविष्णूचा" वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या मागीलबाजूस "चंद्रदेवता" वास
असतो.✍🏻

🍃 या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मधे "परमेश्वरा" चा वास असतो.✍🏻

🍃 विडयाच्या पानाखाली "मृत्युदेवते"चा वास असतो.
या कारणाने ताम्बूलसेवन करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत.✍🏻

🍃 विडयाच्या पानाच्या देठात "अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी" राहतात.म्हणून पान
 सेवन करतांना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी ने.✍🏻

🍃 विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.
यासर्व देवतांचा विडयाच्या पानामधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोण त्याही कारणे विडयाची पाने घरा बाहेर जाऊ देऊ नयेत.
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत .✍🏻

You Might Also Like

0 comments: