Bunty Aur Babli 2 movie review

02:09:00 Nandan Bhalwankar 0 Comments

Watched #BuntyAurBabli2. enjoyed it a lot. What a twisting climax at the end! B&B 4.0 is outstanding.. bt afterall no one can beat original B&B. they hv proved "Baap Baap hota hai" at the end...




0 comments:

मकर संक्रात - तिळगुळ घ्या गोड बोला

21:57:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 "गोड बोला" म्हणजे नक्की काय ? तर दुसऱ्याच्या मनावर आघात होईल असे न बोलणे. मग वाद होणारच नाहीत. कोणी दुखावलेही जाणार नाही. ही काळजी प्रत्येकाने घेतली तर प्रत्येक दिवस मकर संक्रातच असेल, नाही का ?

0 comments:

गुरुचरित्र भाषांतरित🌹 अध्याय एकोणपन्नास

07:56:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 ।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

 श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारकाने सिद्ध्योग्यांच्या चरणांना वंदन करून त्यांचा जयजयकार केला. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझ्यासाठी कृपासागर आहात. आपण मला प्रत्यक्ष श्रीगुरुचरित्र दाखवून कृतार्थ केलेत. या निमित्ताने तुम्ही मला अनेक धर्म सांगितलेत. त्यामुळे मी धन्य ,धन्य झालो. हा संसारसागर अनादीअनंत आहे. तो महाभयंकर आहे. तो जडजीवांना तरुन जाता येत नाही. आरोग्य बिघडले तर वैद्याचे औषध घ्यावे लागते, त्याप्रमाणे हा संसारसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरूलाच शरण जावे लागते. त्याच्या कृपेने हा संसारसागर पार करता येतो. यासाठी गुरुभक्ती करावयास हवी. गुरुभक्ती म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच. गुरुभक्ती हा मुक्तीचा महामार्ग आहे. या संबंधी स्कंदपुराणात ईश्वरपार्वती संवाद असून तो 'गुरुगीता' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात पार्वतीने शंकरांना प्रश्न विचारला होता व त्याला शंकरांनी पार्वतीला गुरुमाहात्म्य सांगितले. गुरुभक्ती कशी करावी हे सविस्तर सांगितले आहे. तो बहुमोल उपदेश मला तुमच्याकडून ऐकवायचा आहे. तो कृपा करून मला सांगा."


नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तू लोकोपकारक ठरेल असा प्रश्न विचारला आहेस.त्याचे उत्तर मी देतो. तू ते एकाग्रचित्ताने श्रवण कर. रम्य अशा कैलास शिखरावर पार्वतीने भगवान शंकरांना भक्तिभावाने नमस्कार करून विचारले, "गुरुभक्ती कशी करावी ? गुरूचा महिमा काय आहे ते मला सांगा. येथे पार्वती ही साधक असून भगवान शंकर हे परात्पर गुरु आहेत. 'मला गुरुमाहात्म्य सांगा' असे पार्वती म्हणाली असता भगवान शंकर म्हणाले, "देवी तू फार उत्तम प्रश्न विचारला आहेस. सर्व लोकांना उपकारक ठरेल अशा तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. लक्षपूर्वक श्रवण कर.भगवान शंकर म्हणाले, तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्व तुला सांगतो. श्रीगुरूच सदैव ब्रम्ह होय, गुरुशिवाय दुसरे ब्रम्ह नाही, हे त्रिवार सत्य. वेदशास्त्र-पुराणे कितीही वाचली, व्रत-तप तीर्थयात्रा कितीही केल्या तरी संसारबंधनातून मुक्त होता येत नाही. शैवशाक्तादी विविध पंथ जीवांना, चुकीचा समज, गैरसमज करून देण्यास कारणीभूत होतात. साधकांच्या मनात भ्रम निर्माण करतात. यज्ञ, व्रत, तप, दानधर्म, तीर्थयात्रा करणारे लोक जोपर्यंत गुरुतत्व जानीत नाहीत तोपर्यंत मूर्खांसारखे भटकत राहतात ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. आपल्या गुरूविषयी पूज्यबुद्धी श्रद्धा असली की मग गुरुभाक्ताला दुसरे काहीही कर्तव्य असत नाही. म्हणून गुरुभक्ती प्राप्त व्हावी यासाठी साधकांनी प्रयत्न करावा. या देहांत अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रुपात राहते. आत्मप्रकाश किंवा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरु शब्दाने तो उदय दर्शविला जातो.. श्रीगुरुचरणांच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांतून मुक्त होते. त्यामुळे देहधारी जीव ब्रम्हरूप होतो. श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून चरणतीर्थ मस्तकी धारण केले असता सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला प्राप्त होते. विविध तपांतून मुक्ती मिळते. सद्गुरुचरणतीर्थ सर्व तीर्थाचे माहेर होय. श्रीगुरूचरणतीर्थ पापहरक आहे. ज्ञानरुपी तेजाला अधिक प्रकाशित करणारे आहे. संसारसागरातून पार करणारे आहे. ते समूळ अज्ञान दूर करते. जन्मकर्मांचे निवारण करते.


ज्ञान-वैराग्यासाठी ते प्राशन करावे. गुरुचरणतीर्थ प्राशन करून श्रीगुरू आज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून श्रीगुरुमूर्तींचे ध्यान करीत गुरुमंत्राचा सदैव जप करावा. श्रीगुरुचे निवासस्थान हेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ हीच गंगा व श्रीगुरु हेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत. श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच साक्षात गयातीर्थ. गुरु हेच गयेचा नित्य स्मरण करावे. गुरुनामाचा जप करावा. गुरुआज्ञा मनःपूर्वक पाळावी. गुरुशिवाय दुसरी कोणतीही भावना मनात ठेवू नये. गुरु ब्रम्हरूप होय. ते गुरुकृपेनेच प्राप्त होते, म्हणून सदैव गुरुचे ध्यान करावे. चिंतन करावे. आपले घरदार, संपत्ती, विद्या, वैभव इत्यादींची आसक्ती सोडून द्यावी. गुरुशिवाय अन्य कशातही भावना ठेवू नये. जे अनन्य भावाने, निष्ठेने गुरुचे चिंतन करतात त्यांना परमपद सुलभ असते, म्हणून प्रयत्नपूर्वक श्रीगुरुची आराधना करावी. गुरुमुखी असलेली विद्या, गुरुभक्तीशिवाय प्राप्त होत नाही.


'गुरु' शब्दातील 'गु' अक्षराचा अर्थ अज्ञानरुपी अंधकार. 'रु' चा अर्थ ज्ञानप्रकाश. अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रम्ह गुरु होय यात शंकाच नाही. 'गुरु' शब्दातील 'गु' कार मायादी गुण प्रकट करणारा असून 'रु' कार ब्रम्हाचे द्योतक आहे. गुरु हा मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा आहे. गुरुचरण श्रेष्ठ होत. ते देवांनाही दुर्लभ आहेत गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही, म्हणून गुरु संतुष्ट होण्यासाठी सर्व काही गुरूला अर्पण करावे. श्रीगुरुची आराधना करावी. आपले सर्वस्व गुरूला समर्पण करावे. गुरुकृपा परमेश्वरप्राप्तीचे साधन आहे. काया-वाचा-मनाने सदैव गुरूची आराधना करावी. आपल्या गुरूला सर्वभावे शरण जावे. श्रीगुरूला साष्टांग नमस्कार घालावा. संसारवृक्ष आरूढ होऊन नरकार्णवात पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरुला नमस्कार करावा.


गुरु हाच ब्रम्हा, विष्णू, महेश्स्वरूप आहे. गुरूच परब्रम्ह आहे म्हणून अशा गुरूला नमस्कार करावा. गुरु हा जगाच्या उत्पत्तीचा हेतू आहे. तो संसारसागर पार पाडणारा सेतू असून सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदयस्थान आहे. अशा शिवस्वरूप गुरूला नमस्कार करावा. अज्ञानरुपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्ञानांजन घालून ज्याने दिव्यचक्षू उघडले व त्याला आत्मस्वरूपाचा निधी दाखविला त्या श्रीगुरुला सदैव नमस्कार करावा. गुरु हाच माता-पिता बंधू आहे. या गुरूच्या अस्तित्वाने जगाला अस्तित्व येते. त्याच्याच प्रकाशाने जग प्रकाशते व त्याच्याच आनंदमयी स्वरूपाने सर्वजण आनंदित व सुखी होतात. जगाला अर्थ येतो तो गुरूमुळे. जीवन सार्थ होते ते गुरूमुळे. जग अशाश्वत असुअनहि नित्याचे वाटते ते गुरूमुळे. गुरु म्हणजे दैदिप्य्मान आत्मसूर्य. ज्याच्यामुळे हे जग चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला सजीवता प्राप्त होते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती इत्यादी अवस्था ज्याच्यामुळे प्रकाशित होतात त्या गुरूला नमस्कार. श्रीगुरुमुळेच विश्व शिवाहून भिन्न दिसत नाही. तो पूर्ण अभेदयोगी असतो. जगाचे मूळ कारण सद्गुरु. गुरुचे कार्य जगतरूपाने भासते. गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नव्हे. गुरु म्हणजे सर्व सामर्थ्यशाली शक्ती होय. गुरु हा अव्यक्त परमेश्वराचे व्यक्तरुप होय. श्रीगुरुचे चरण सुख-दुःखादी द्वंद्वापासून होणारा त्रास नाहीसा करतात. सर्व आपत्तीतून तारून नेतात. शिव क्रुद्ध झाला तर गुरु शरण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर आपला त्राता कोणीही असत नाही. गुरुचरण शिवशक्तीरूप असतात. शिव आणि शक्ती ह्यांच्या मिलापाने व्यक्त झालेले रूप म्हणजे श्रीगुरु. जो गुणरूपांच्या पलीकडे-म्हणजेच निर्गुण, निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते. गुरु हा त्रिनेत्र नसूनही शिवरूप आहे. चतुर्भुज नसूनही विष्णू आहे व चतुर्मुख नसूनही ब्रम्हदेव आहे. श्रीगुरुच्या कृपेमुळेच जीवाला भेदात्मक संसारातून मुक्त होता येते. तो दयासागर आहे. त्याच्या कृपेला भारती यावी म्हणून त्याला हात जोडून प्रणाम करावा. श्रीगुरुचे परमरूप विवेकरुपी चक्षूंसाठी अमृतासमान असते; पण मंदभाग्य असलेले जिब ह्या गुरुस्वरूपाला बघू शकत नाही. ज्या दिशेला चरणयुगल असतात त्या दिशेला दररोज भक्तिपूर्वक नमस्कार करावा. एक गुरुभक्ती जमली की इतर साधना आपोआप होतात. श्रीगुरूगीता गुरुभक्तीयोगाचे शास्त्रच आहे. श्रीगुरुचा अनुग्रह झाला की अज्ञानाचा नाश होतो. संसारवणवा नष्ट होतो. सच्चिदानंदस्वरूप त्याचा अवतार असतो. गुरु हा केवळ ब्रम्हविद्या देत नाही, तर तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देतो. गुरुचे केवळ स्मरण केले असता आपोआप ज्ञान उत्पन्न होते. गुरु हा चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत आकाशदिशापेक्षा सूक्ष्म, निरंजन नादातीत असतो. सर्व चराचर सजीव-निर्जीव जग श्रीगुरुचे व्यापले आहे. गुरु हा साधकाला भक्ती-मुक्ती, भोग व मोक्ष देतो. तो आपल्या आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मांतील संचित कर्माचे भस्म करतो. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही.


गुरुसेवा व गुरुभक्ती याहून श्रेष्ठ दुसरे तप नाही. गुरु हा सर्व जगाचा स्वामी असून तो सर्वव्यापी आहे. गुरुतत्व स्वयंभू आहे. गुरु हेच परमदैवत आहे. म्हणून गुरूला सदैव नमस्कार करावा. गुरूच्या चरणतीर्थात सप्तसमुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते. श्रीहरी कोपला तर गुरु भक्ताचे रक्षण करतो; पण गुरूच रुष्ट झाला तर भक्ताला त्राता कोणीही नाही. म्हणून गुरूची मनःपूर्वक पूजा करावी. गुरुभक्ती केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते. गुरुहून श्रेष्ठ कोणीही नाही असे श्रुतिवचन आहे, म्हणून काया-वाचा-मनाने गुरूची नित्य सेवा करावी.


केवळ गुरुकृपेमुळेच ब्रम्हा-विष्णू-महेश जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करू शकतात, अखंड गुरुस्मरण घडणे हीच गुरुसेवा. देव-गन्धर्वादीसुद्धा जर गुरुसेवा करणार नसतील तर ते मुक्त होऊ शकत नाहीत. गुरुध्यान हे सर्वप्रकारचा आनंद, सुख, भक्तीमुक्ती व मोक्ष देणारे आहे. म्हणूनच परब्रम्हस्वरूप गुरुचे स्मरण करावे. त्याचे स्तवन करावे. त्याला नमस्कार करावा, गुरु हा ब्रम्हानंदस्वरूप, ज्ञानस्वरूप, द्वंद्वरहित, निर्लेप, सर्वसाक्षी भावावीत, त्रिगुणरहित असतो. तो नित्य बद्ध, निराकार, परब्रम्हस्वरूप आहे. तो आनंदस्वरूप,आनंददाता, ज्ञानस्वरूप, योगीश्वर, संसाररोगावर औषध देणारा वैद्य आहे. गुरुहून श्रेष्ठ काहीही नाही. हे शिवशासन आहे म्हणूनच तो परमकल्याणकारी आहे. अशाप्रकारे गुरुध्यान केल्यास शिष्याच्या ठायी आत्मज्ञान आपोआप येते. गुरूने दाखविलेल्या मार्गानेच साधना करून चित्तशुद्धी करून घ्यावी.


भगवान सदाशिव पार्वतीला म्हणतात, "हे गुरुमाहात्म्य ऐकूनही जो गुरुनिंदा करील तो घोर नरकात पडेल. बुद्धिमान शिष्याने गुरूशी कधीही खोटे बोलू नये. गुरु फसत नाही-फसतो तो शिष्य. गुरुकृपा-प्राप्त साधकाने निःशंकपणे साधना करावी. जेथे गुरुप्राप्ती आहे तेथे भीती असूच शकत नाही.


गुरुगीता गुरुभक्ती शिकविते. गुरुमहती पटविते. श्रीगुरूगीता श्रुतिस्मृतींचे सार होय. श्रीगुरुगीता म्हणजेच गुरुजप. गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरुउपदेशानुसार साधना करणे. गुरुसेवेने गुरुप्रसाद लाभला की आत्मसाक्षात्कार होतो. गुरुभक्ताला गुरुउपसानेनुसार शाश्वती लाभते. गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा उपाय आहे.


यानंतर पार्वतीने महादेवांना पिंड, पद, रूप व रूपातित म्हणजे काय असे विचारले असता भगवान शंकर म्हणाले, "कुंडलिनीशक्तीला पिंड म्हणतात. हंस म्हणजे पद. बिंदूला रूप व निरंजन निराकार परमात्म्याला रूपातीत म्हणतात. ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली, ज्याचा 'हंस:' मंत्राक्षरात प्राण स्थिर झाला व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूत दर्शन झाले आहे व जो निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त. साधकाला साक्षात्कार झाला की तो अनासक्त होतो. गुरुकृपा - प्रसादाने त्याचे मन शांत होते. मग तो प्रारब्धाने जे सहज मिळेल ते अलिप्तपणे भोगतो. त्याला बसल्याजागी आनंद, शांती लाभते.


यानंतर भगवान शंकरांनी श्रीगुरूगीतेचे भक्तिपूर्वक पठणश्रवण केल्याने कोणते विशेष फळ मिळते ते सांगितले. श्रीगुरूगीतेच्या पठणश्रवणाने साधकाला नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते. तो भव्यव्याधीतून मुक्त होतो. सर्वप्रकारचे पाप, ताप, दैन्य, दुःख नाहीसे होते. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व्याधी नाहीशा होतात. सर्व सिद्धींची प्राप्त होते. प्रारब्धाने जरी असाध्य रोग निर्माण झाला, तरी साधक श्रीगुरूगीता जपाने रोगमुक्त होतो. म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने योग्यस्थळी, योग्य आसनावर बसून परमश्रद्धेने स्वतःच श्रीगुरुगीता पाठ करावा. त्यामुळे जीवन सार्थ, कृतकृत्य, यशस्वी व मंगलदायी होते. इच्छापूर्ती होते. गुरुप्रसाद लाभतो. श्रीगुरूगीतेच्या जपाने साधकाला दीर्घायुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र-पौत्र इत्यादींचा लाभ होतो. श्रीगुरुगीता सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आहे. कल्पवृक्ष आहे. साक्षात चिंतामणी आहे. एका श्रीगुरूगीतेच्या उपासनेने सर्व देवदेवतांची उपासना होते. श्रीगुरूगीतेच्या पठणाने जीवाशिवाचे ऐक्य होते. त्याच्यावर सरस्वतीची पूर्ण कृपा होते. असे सांगून भगवान सदाशिव म्हणतात, मी सांगितलेले ते त्रिवार सत्य आहे. श्रीगुरूगीतेचे पठणश्रवण करणाऱ्याला अनंत फलप्राप्ती होते.


अशाप्रकारे भगवान शंकरांनी श्रीगुरूभक्तीचे व श्रीगुरुगीतेचे माहात्म्य पार्वतीला सांगितले. सिद्धयोग्यांनी त्याचा आश्रय नामधारकाला सांगितला. सारांश, शहाण्याने गुरु नित्य भजावा. गुरुसेवेचे फळ अनंत आहे. श्रीगुरुला शरण जावे. श्रीगुरू संतुष्ट झाले असता त्रैमूर्ती संतुष्ट होतात. याला वेदशास्त्री संमती आहे. या कलियुगात वेदमार्ग लोप पावला. लोक मूर्ख झाले. पशुसमान वागू लागले. डोळे-कान असूनही अंध-बहिरे झाले आहेत, म्हणून शहाण्या माणसाने मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे मनात गुरुभाव धारण करावा. त्यामुळे भवबंधनातून सुटका होईल. कैवल्यपदाची प्राप्ती होईल. या कलियुगात संत-सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, भूभार हलका करण्यासाठी श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींनी नावांनी घेतला. गुरुभक्ती ही कामधेनू आहे. याविषयी शंका न धरता श्रीगुरुंना शरण जावे. त्यामुळे यमपाश तुटेल. सर्व पातकांचा क्षय होईल.


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गुरुमाहात्म्य - श्रीगुरुगीता' नावाचा अध्याय एकोणपन्नासावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

0 comments:

गुरुचरित्र अध्याय पन्नासावा

07:54:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "यानंतर एक मोठी अपूर्व घटना घडली. पूर्वी तुला मी एका रजकाची कथा सांगितली होती. श्रीगुरुंनी त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका रजकाला 'तू पुढच्या जन्मी बैदुरनगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी यतिरूपाने तुला भेटेन' असा वर दिला होता. ही कथा तुला चांगली आठवत असेल. त्यानुसार तो रजक यवनधर्मात जन्मास आला व बेदरचा राजा झाला. तो सर्वप्रकारच्या ऐश्वर्याचा व लौकिक सुखाचा उपभोग घेत बेदरला राज्य करीत होता. तो हीन जातीत जन्मास आला तरी पूर्वजन्मातील पुण्याईने व संस्कारामुळे तो मोठा पुण्यशील, सुसंस्कृत, उदार अंतःकरणाचा होता. तो सर्व धर्म समान मानीत असे. सर्वांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. तथापि पूर्वसंस्कारामुळे त्याचे ब्राम्हणांवर विशेष प्रेम होते. त्याच्या राज्यात अनेक मठ-मंदिरे होती; पण तो यवन असूनही कुणाला कसलाही त्रास देत नसे. उलट, मठ-मंदिरांना उदार हस्ते दानधर्म करीत असे. त्यामुळे त्याचे पुरोहित त्याला समजावीत. 'आपण यवन आहोत. आपला धर्म वेगळा, हिंदूंचा वेगळा. आपण त्यांच्या देव-ब्राम्हणांची निंदाच केली पाहिजे. तुम्ही मात्र त्यांची सेवा करीत आहात. यामुळे मोठा दोष निर्माण होतो.आपण आपल्या जातीधार्माप्रमाणेच वागले पाहिजे. त्यामुळेच पुण्यप्राप्ती होते. ते ब्राम्हण महामूर्ख आहेत. ते दगडधोंड्यांची देव म्हणून पूजा करतात. ते वृक्ष, पाषाण, लाकडांनाही देव समजतात. ते लोक गाय, अग्नी, सूर्य, तीर्थ, नदी इत्यादींना देवदेवता समजतात व त्यांची पूजा करतात. ते मंद बुद्धीचे ब्राम्हण निराकार परमेश्वराला साकार मानतात. अशांची जर यवनांनी सेवा केली तर त्यांचा अधःपात होतो." यवन पुरोहित असे बोलू लागला असता त्या यवन राजाला अतिशय राग आला. तो त्या यवन पुरोहिताला म्हणाला, "अहो, तुम्हीच उपदेश करता, की परमेश्वर अणुरेणुतृणकाष्ठात आहे. परमेश्वर सर्वेश्वर असून तो सर्वत्र आहे. मी सुद्धा तेच मानतो; सर्व सृष्टी त्या परमेश्वरानेच निर्माण केली आहे.


सर्व प्राणी, पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. सर्वांची पृथ्वी एकाच आहे. कुंभार मातीपासून वेगवेगळी गाडगी-मडकी तयार करतो, पण त्यात माती एकच असते. गाई वेगवेगळ्या रंगाच्या असल्या तरी त्या सर्वांच्या दुधाचा रंग एकच, पांढराच असतो. त्याप्रमाणे देह वेगवेगळे असले तरी सर्वांच्या ठायी परमात्मा एकच असतो. पृथ्वीवर मानवजाती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा परमेश्वर एकाच आहे. 'नाना देही देव एक विराजे' हे सर्व सामान्य तत्व आहे. आपलेच मत खरे आहे असे मानून इतरांची निंदा कशासाठी करावयाची ? म्हणून शहाण्याने कोणत्याही धर्मपंथाची निंदा -स्तुती करू नये. प्रत्येकजण आपापल्या चालीरीतीप्रमाणे वागत असतो, म्हणून "आम्ही म्हणतो तेच खरे, इतरांचे चूक असे माणू नये." असे बोलून राजानें यवनपुरोहितांचा युक्तिवाद खोडून काढला.


पुढे काही दिवसांनी त्या यवनराजाच्या मांडीवर गळूसारखा एक फोड आला. त्यावर त्याने वैद्यांच्या सल्ल्याने अनेक औषधोपचार केले; पण काही केल्या गुण येईना. त्याला असह्य वेदना होत होत्या. तो दिवस रात्र तळमळत असे. त्यावेळी श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात होते. आपली कीर्ती ऐकून तो यवनराजा आपल्याला भेटावयास येईल त्यांना असे वाटले. तसे झाले तर येथील ब्राम्हणांना ते आवडणार नाही. त्यांना विनाकारण त्रास होईल म्हणून आपण आता गुप्त राहावे हेच योग्य. असा विचार करून श्रीगुरू शिष्यांना म्हणाले, "यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वानिमित्त आपण गोदावरी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे मला वाटते. तुम्ही यात्रेची तयारी करा." श्रीगुरुंनी असे सांगताच सर्व शिष्य तयारीला लागले.


इकडे तो यवन राजा मांडीवरील फोडाच्या व्याधीने फारच त्रस्त झाला. नाना प्रकारची औषधे झाली, हकीम झाले, मात्र काडीमात्र दुखणे बरे होईना. काय करावे, त्याला काही समजेना. मग त्याने काही विद्वान ब्राम्हणांना पाचारण केले. तो त्या विद्वान ब्राम्हणांना म्हणाला, "माझ्या व्याधीपुढे सर्व वैद्य-हकीमांनी हात टेकले आहेत. कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही. जीव अगदी नकोस झाला आहे. आता यावर काय इलाज करायचा ?" त्यावर ते ब्राम्हण म्हणाले, "राजा, पूर्वजन्मीचे पाप असे व्याधीच्या रूपाने पीडा देते. ज्यावेळी मानवी उपाय थांबतात, त्यावेळी काही दैवी उपाय करावे लागतात. यासाठी आपण तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करावा. त्यामुळे ही व्याधी नाहीशी होईल किंवा एखाद्या थोर सत्पुरुषाची सेवा करावी. त्याच्या कृपादृष्टीने आजार नाहीसा होईल. सत्पुरुषाच्या दृष्टीने कोटीजन्माची पापे नाहीशी होतात, तेथे आपल्या या व्याधीचे काय चालणार ?" त्यावर तो यवनराजा म्हणाला, मला यवन असे मानू नका. मी ब्राम्हणांचा दासानुदास आहे. मी पूर्वजन्मी श्रीगुरूचरणांची सेवा केली होती; पण काही पापांमुळे मला यवन कुळात जन्म घ्यावा लागला आहे. त्याला माझा इलाज नाही. मी आपणास शरण आलो आहे. मला एखादा निश्चित उपाय सांगा. " राजाने अशी विनवणी केली असता ते ब्राम्हण म्हणाले, "महाराज, तुम्ही गुप्तपणे पापविनाशी तीर्थास जा व त्या तीर्थात स्नान करा. त्यामुळे पापक्षालन होऊन तुमचा रोग बरा होईल."


ब्राम्हणांनी असे सांगितले असता राजाला आनंद झाला. मग तो कुणालाही बरोबर न घेता, एकटाच गुप्तपणे पापविनाशी तीर्थावर गेला. तेथे त्याने मोठ्या भक्तिभावने स्नान केले. त्याचवेळी तेथे एक संन्यासी आला. राजाने त्याला साष्टांग नमस्कार केला. मग आपल्या मांडीवरील फोड दाखवून त्याने विचारले, "यतिमहाराज, माझी ही व्याधी कशामुळे बरे होईल ?" त्यावर तो संन्यासी म्हणाला, "एखाद्या थोर अवतारी पुरुषाचे दर्शन घेतले असता तुझा हा आजार पूर्ण बरा होईल. थोर अवतारी पुरुषाच्या कृपादृष्टीचा प्रभाव किती मोठा असतो याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती ऐकलीस की तुझी खात्री पटेल." असे बोलून त्या सन्याशाने कथा सांगण्यास सुरुवात केली.


पूर्वी अवंतीनगरीत एक ब्राम्हण राहत होता. तो नुसता नावाचाच ब्राम्हण. अत्यंत दुराचारी होता. मदोन्मत्त होता. ब्राम्हणकुळाला कलंक असलेला तो अनेक स्त्रियांशी ब्याभिचार करीत असे. तो स्नानसंध्या-पूजापाठ इत्यादी जो ब्राम्हणाचा आचारधर्म त्याचा पूर्ण त्याग करून पिंगला नावाच्या एका वेश्येच्या घरी राहत असे. तिच्याकडे भोजन करीत असे.


एकदा तो त्या वेश्येच्या घरी असताना ऋषभनावाचा एक महायोगी तेथे आला. त्याला पाहताच त्या ब्राम्हणाने व पिंगलेने त्या महायोग्याला साष्टांग नमस्कार घालून त्याला सन्मानपूर्वक घरात आणले व त्याची मोठ्या भक्तिभावाने यथासंग पूजा केली. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला उत्तम भोजन दिले व पलंगावर झोपविले. त्याचे पाय चेपले. त्याला गाढ झोप लागली. ती दोघे रात्रभर त्या योगेश्वाराची सेवा करीत राहिले. त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेला तो ऋषभ योगेश्वर सकाळी जागा झाला. त्या दोघांना आशीर्वाद देऊन निघून गेला. कालांतराने त्या दुराचारी ब्राम्हणाला व पिंगला वेश्येला वार्धक्याने मृत्यू आला.


त्या वृषभ योग्याची मनोभावे सेवा केल्यामुळे तो ब्राम्हण दशार्ण राजा वज्रबाहू व त्याची सुमती नावाची पत्नी यांच्या पोटी जन्मास आला. सुमती गर्भवती असताना तिच्या सवतीने मत्सरापोटी तिला विष घातले. त्या विषाने ती मेली नाही. पण तिच्या सर्वांगाला फोड झाले. तशाच स्थितीत ती प्रसूत झाली. विषामुळे नवजात बाळाच्या अंगावरही फोड उठले. त्या मायलेकरांचे अतिशय हाल होत होते. त्यांना वेदना होत होत्या. त्यांचे हाल पाहून राजाला मोठी काळजी वाटू लागली. त्याने पुत्रजन्माचा उत्सव केला नाही. त्याने मोठमोठ्या वैद्यांना पाचारण करून राणीवर व राजपुत्रावर औषधोपचार केले; पण कशाचाही उपयोग झाला नाही. ती मायलेकरे असह्य वेदनांनी ओरडत होती. राजाला त्या दोघांचे हाल पाहवेनात. त्या फोडांनी तय दोघांची शरीरे नासून किळसवाणी झाली. शेवटी राजाने मन कठोर करून त्या दोघांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने काही कोळ्यांना बोलाबून सांगितले, "या दोघा मायलेकरांना निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडून या." राजाचा हा निर्णय ऐकून राजवाड्यातील सर्व स्त्री-पुरुषांना अतिशय दुःख झाले. ते राजाला शिव्याशाप देऊ लागले. त्याला पापी दुराचारी म्हणून लागले. राजाच्या आज्ञेनुसार कोळ्यांनी राणीला व राजपुत्राला रथात बसवून निर्मनुष्य अशा अरण्यात नेउन सोडले. बिचारी सुमती आधीच शरीरावरील फोडांनी त्रस्त झालेली, त्यातच पतीने त्याग केलेला, यामुळे ती आक्रोश करत होती. आपल्या व्याधीग्रस्त मुलाला कडेवर घेऊन रानावनात भटकू लागली. अन्नपाण्याविना तिचे फार हाल होत होते. त्या घोर अरण्यात भटकत असता तिला काही गुराखी दिसले. ती त्यांच्याजवळ पाणी मागू लागली, तेव्हा ते गुराखी तिला म्हणाले, "तू अशीच पुढे जा. तेथे तुला एक मंदिर दिसेल. तेथे तुझी खाण्यापिण्याची, राहण्याची सोय होईल." असे त्या गुराख्यांनी सांगितले असता सुमती मुलाला घेऊन पुढे जाऊ लागली. वाटेत तिला एक गाव लागले. त्या गावातील लोक तिला सुखी समाधानी वाटले. ते पाहून तिला खूप बरे वाटले. तिने त्या गावातील स्त्रियांकडे जाऊन 'या गावाचा राजा कोण आहे ?' असे विचारले असता त्या स्त्रिया म्हणाल्या, 'पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो मोठा पुण्यवान, परोपकारी, धर्मशील श्रीमंत आहे. तू त्याला भेट. त्याला आपली परिस्थिती सांग. तो तुला नक्की आश्रय देईल." त्या स्त्रिया असे सांगत होत्या, त्याचवेळी पद्माकाराची दासी योगायोगाने तेथे आली. त्या मायलेकरांची दयनीय अवस्था पाहून त्या दासीला त्यांची दया आली. ती त्या दोघांना घेऊन पद्माकाराच्या घरी गेली. त्या पद्माकर वैश्याने त्या दोघांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या अन्नवस्त्राची, राहण्याची अवस्था केली.


त्या पद्माकर वैश्याकडे राहत असताना एके दिवशी तय राजपुत्राला- म्हणजे सुमतीच्या मुलाला मृत्यू आला. आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून सुमती दुःखाने जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागली. राजवाड्यातील स्त्रियांनी तिचे परोपरीने सांत्वन करण्याचा प्रयत्न केला; पण सुमतीचा शोक काही केल्या थांबेना. त्याचवेळी दोघांचे पूर्वजन्मातील पुण्यकर्म लक्षात घेऊन महायोगी ऋषभ तेथे प्रकट झाला. त्याला पाहताच पद्माकर वैश्याने त्या योगीशाला साष्टांग नमस्कार करून त्याची यथासंग पूजा केली.


त्यावेळी त्या योगीशाने विचारले, "घरात कोण बरे रडत आहे ? काय झाले आहे ? " पद्माकाराने त्या मायलेकरांची हकीगत सांगितली. ती ऐकताच त्या महायोगी ऋषभाला त्या मायलेकरांची दया आली. मग तो सुमतीजवळ जाऊन तिला समजावीत म्हणाला, "तू विनाकारण का बरे शोक करतेस ? या जगात कोण जन्मास आला ? आणि कोण मेला ? सांग बरे. या जगात चिरंजीव कोण आहे ? जो जन्मास येतो त्याला एक न एक दिवस मृत्यू येतोच. हे जग क्षणभंगुर आहे. देह हा नाशिवंत आहे. गंगेच्या पाण्यावरील फेस किंवा पाण्यातील बुडबुडा, त्याप्रमाणे दे जग क्षणिक आहे, म्हणून शहाण्या मनुष्याने जन्म-मृत्यूबद्दल आनंद किंवा दुःख करू नये. मातेच्या उदरात जेव्हा गर्भ निर्माण होतो तेव्हा त्याचा मृत्यूही ठरलेला असतो. कोणी तरुणपणी मरतो तर कोणी वृद्धपणी मरतो. प्रारब्धानुसार सर्व काही घडत असते. आई-वडील, पुत्र इत्यादी नाती मायेपोटी निर्माण झालेली असतात. ब्रम्हदेवाने लिहिलेली ललाटरेषा कधीही बदलत नाही. मला सांग, गतजन्मी तू कोणाची पत्नी होतीस ? कोणाची तू माता होतीस ? कोण तुझा पुत्र होता ? सांगता येत नाही ना ? मग तू विनाकारण शोक का बरे करतेस ? तेव्हा शोक आवर व भगवान सदाशिवला शरण जा." त्या महायोगी ऋषभाने असे परोपरीने समजाविले तरी, सुमतीचे दुःख कमी झाले नाही. ती म्हणाली, "योगीराज, मी या व्याधीने मरणयातना भोगत आहे. मी राज्यभ्रष्ट झाले आहे. माझ्या पतीने माझा प्राणत्याग केला आहे आणि माझा जीव की प्राण असा माझा पुत्र मरण पावला आहे. अशा परीस्थितीत मी जिवंत तरी कशी राहू ? मला आता मरण आले तर बरे होईल ."


सुमतीचे दुःख पाहून ऋषभ योग्याला तिची दया आली. त्याने थोडे भस्म घेऊन त्या मृत बालकाला लावले व त्याच्या मुखातही घातले. त्याच क्षणी तो मुलगा जिवंत झाला. ऋषभाने आणखी भस्म अभिमंत्रित करून त्या मायलेकरांच्या शरीराला लावले. आणि काय आश्चर्य ! दोघेही रोगमुक्त झाली. शरीराला सुवर्णकांती प्राप्त झाली.


दोघांच्याही शरीरावरील फोड पूर्ण नाहीसे झाले. प्रसन्न झालेल्या त्या ऋषभ योग्याने दोघांना वर दिला, "तुम्हाला कधीही वार्धक्य येणार नाही. तुम्ही सदैव तरुण राहाल." त्या योग्याने सुमतीला वर दिला, 'तुझा पुत्र दीर्घायुषी होईल. त्याला फार मोठी कीर्ती लाभेल. तो आपल्या पित्यापेक्षा अधिककाळ राज्य करील." असा वर देऊन तो ऋषभ योगी एकाएकी निघून गेला.


ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला, "हे राजा, चिंता करू नकोस. सत्पुरुषाच्या कृपाप्रसादाने तुझ्याही मांडीवरील हा फोड नाहीसा होईल, यावर तू पूर्ण विश्वास ठेव." त्या संन्याशाने असे सांगितले असता यवनराजाने नमस्कार करून विचारले, "ते सत्पुरुष कोठे आहेत ? मला सांगा, म्हणजे मी लगेच त्यांच्याकडे जातो व त्यांच्या चरणांचे दर्शन घेतो." त्यावर तो संन्यासी म्हणाला, "गाणगापुरात भीमेच्या तीरावर ते महात्मा आहेत. तू त्यांच्याकडे जा व त्यांचे दर्शन घेताच तुझी व्याधी नाहीशी होईल." हे ऐकताच तो यवनराजा श्रीगुरुंच्या दर्शनाला निघाला. मजल-दरमजल करीत गाणगापुरात आला. त्याने गावातील लोकांना विचारले, "येथे एक थोर संन्यासी आहेत असे ऐकतो. आता ते कोठे आहेत ?" असे त्याने विचारताच गावातले लोक घाबरले. ते आपापसात म्हणाले, "अहो, आता काही खरे नाही. हा यवन श्रीगुरूंची चौकशी करतो आहे. आता हा काय करील सांगता येत नाही." अतिशय घाबरलेले ते लोक काहीही बोलेनात. तेव्हा तो राजा रागावून म्हणाला, "अरे, बोला ना ! मी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. ते आता कोठे आहेत ते सांगा." मग लोक म्हणाले, "श्रीगुरू नित्य मध्यान्हकाळी भीमा-अमरजा संगमावर अनुष्ठानासाठी जातात. अनुष्ठान पूर्ण झाले की मठात परत येतात. आता ते संगमावर आहेत." हे ऐकताच यवन राजा आपला लवाजमा मागे ठेवून एकटाच मेण्यात बसून श्रीगुरुंना भेटण्यासाठी संगमावर गेला. दुरूनच श्रीगुरुंना पाहताच तो मेण्यातून खाली उतरला, पायी चालत चालत श्रीगुरुंच्या समोर गेला व भक्तिभावाने हात जोडून उभा राहिला. श्रीगुरुंनी त्याला विचारले, "काय रे रजका ! तुमची माझी भेट पूर्वी झाली होती. आता खूप वर्षांनी परत आला आहेस !" श्रीगुरू असे बोलताच त्या राजाला पूर्वजन्माची आठवण झाली. त्याने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या चरणपादुकांवर लोळण घेतली. त्याचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आपण माझी उपेक्षा का बरे केलीत ? मी अनाथ झालो. मी आपल्या चरणांपासून वेगळा झालो. मी मदोन्मत्त होऊन आपले चरण विसरलो. आपण जवळ होतात तेव्हा मी आपणास ओळखले नाही. आपण भक्तजनांची कधीही उपेक्षा करत नाही, अशी माझी पूर्ण खात्री होती मग आपण मला अज्ञानसागरात का बरे लोटून दिलेत ? आता माझा उद्धार करा. यासाठी मी आपणास शरण आलो आहे. आता मला हा जन्म पुरे !


श्रीगुरू त्याला म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या सर्व इच्छा, वासना पूर्ण होतील. " तेव्हा राजा म्हणाला, "स्वामी, माझ्या मांडीवर मोठा फोड आला आहे. त्याच्या असह्य वेदना होत आहेत. आपण एकदा कृपादृष्टीने पाहावे." राजाचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू हसून म्हणाले, "अरे, तो फोड कोठे आहे दाखव बरे !" राजा पाहतो तो काय ? तो असह्य वेदना देणारा फोड नाहीसा झाला होता. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. तो श्रीगुरुंच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, "स्वामी, मला आपण रोगमुक्त केलेत. मला राजपद व सर्व ऐश्वर्ये देऊन माझी गत्जान्मातील इच्छा पूर्ण केलीत, ही सगळी केवळ आपली कृपा ! आता आपण एकदा तरी माझ्या राजधानीत यावे अशी प्रार्थना आहे." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "अरे, आम्ही आहोत तापसी संन्यासी ! आम्ही तुझ्या नगरात कसे येणार ? तेथे तर हिंसादी पापकर्मे चालू असतात. तेथे गोहत्या होत असते. जीवहिंसा हे महापाप अशा ठिकाणी आम्ही येणे योग्य ठरणार नाही." राजा म्हणाला, "हे सर्व घडते. माझा पूर्वीचा जन्म रजकाचा, पण आपल्या आशीर्वादाने मला राज्य मिळाले, अनेक प्रकारची सुखे मला मिळाली; पण एकदा मला पुत्रपौत्र समजून आलात तर सर्व गोष्टींचा त्याग करून आपली सेवा करीत राहीन." राजाने अशी परोपरीने विनंती केली असता श्रीगुरुंनी विचार केला, "आता यापुढे यवनांची सत्ता वाढणार तेव्हा आता या कलियुगात जास्त काऴ प्रकट राहणे योग्य नाही. आज हा यवन राजा येथे आला, उद्या त्याचे प्रजाजन येऊ लागतील. तेव्हा आता गुप्त होणेच योग्य. तेव्हा सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीयात्रा करू व या राजाचीही इच्छा पूर्ण करू." असा विचार करून ते मठाकडे निघाले. राजाने त्यांना मेण्यात बसविले. त्यांच्या पादुका हातात घेऊन तो पायी चालू लागला, तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तू ब्राम्हणाची सेवा करतो आहेस असे तुझ्या लोकांनी पहिले तर ते तुझी निंदा करतील, म्हणून तू मेण्यात बस." पण राजाने ते मानले नाही. 'मी आपला दासानुदास आहे.' असे म्हणून तो चालतच निघाला. राजाने आपल्याबरोबर आणलेले सर्व ऐश्वर्य दाखविले. श्रीगुरू त्याला म्हणाले, "राजा, तुझ्या या लवाजम्याबरोबर जायचे तर उशीर होईल माझ्या नित्य अनुष्ठानात खंड पडेल. तू पुढे जा. मी तुझ्या नगरीत येईन." असे सांगताच राजा निघून गेला. मग श्रीगुरू शिष्यांसह अदृश्य झाले व मनोवेगे पापविनाशी तीर्थावर आले.


श्रीगुरू आल्याचे समजताच सायंदेव साखरेचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते. नागनाथाने श्रीगुरुंना आपल्या घरी नेउन त्यांची यथासंग पूजा केली व मोठी समाराधना केली. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, "आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवन राजा मला पापविनाशी तीर्थावर भेटावयास येणार आहे. मी तेथे दिसलो नाही तर तो येथे येईल. तुम्हा ब्राम्हणांना त्याचा उपद्रव होईल." असे सांगून व त्याला अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पापविनाशी तीर्थावर गेले. पूर्वी ठरल्याप्रमाणे यवनराजा तेथे आला. त्याने श्रीगुरुंना पालखीत बसवून वाजतगाजत आपल्या राजधानीला नेले. ब्राम्हणादी हिंदूंना आनंद झाला; पण यवनांची राजाची निंदा केली. राजाने श्रीगुरुंना उच्चासनावर बसवून त्यांची पाद्यपूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या शिष्यांचा सन्मान केला. मोठा दानधर्म केला. ब्राम्हणांना व याचकांना संतुष्ट केले. या निमित्ताने प्रजाजनांनाही श्रीगुरुंच्या दर्शनाचा लाभ झाला. संतुष्ट झालेल्या श्रीगुरुंनी एकांतात राजाला आशीर्वाद देऊन विचारले, "आता तू संतुष्ट झाला आहेस न ? तुझी आणखी काही इच्छा आहे काय ? असेल तर सविस्तर सांग." राजा म्हणाला, "स्वामी, आता तुमची चरणसेवा घडावी एवढीच माझी इच्छा आहे. मला मुक्ती हवी आहे. ते ज्ञान मला द्या." श्रीगुरू म्हणाले, "तुझी इच्छा पूर्ण होईल. तू आपल्या पुत्रावर राज्याची जबाबदारी सोपवून श्रीशैल्य पर्वतावर ये. तेथे आपली भेट होईल." असे सांगून श्रीगुरू गौतमी यात्रा करून गाणगापुरात परत आले. श्रीगुरुंना पाहताच सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी त्यांची मंगल आरती केली. मग सर्व शिष्यांना जवळ बोलावून श्रीगुरू त्यांना म्हणाले, "माझी सर्वत्र ख्याती झाली आहे. बिदरचा यवन राजा माझा भक्त झाला आहे. हे पाहून त्याचे प्रजाजानही आपल्या वासनापूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व ब्राम्हणांना त्रास होईल, म्हणून मी प्रकटरूपाने श्रीशैल्य यात्रेला जाणार आहे. मात्र गुप्त, सूक्ष्म देहाने मी येथेच गाणगापुरात वास्तव्य करणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा." असे सांगून लौकिकार्थाने ते श्रीशैल्य यात्रेला निघाले. असे सिद्ध्योग्यांनी नामधारकाला सांगितले.


ग्रंथकार सरस्वती गंगाधर म्हणतात, "श्रीगुरूनृसिंहसरस्वती गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पहिले आहे. जे लोक त्यांची भक्तिभावाने उपासना, आराधना करतात, त्यांच्या सर्व इच्छाकामना त्वरित पूर्ण होतात. याविषयी जराही संदेह बाळगू नये. ज्यांना विनाकष्ट कामनापुर्ती हवी असेल त्यांनी गाणगापुरास जावे. तेथे प्रत्यक्ष कल्पवृक्ष आहे. तेथे गेले असता मनातल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतात. धन, धान्य, पुत्र-पौत्र इत्यादी जे हवे असेल ते प्राप्त होते."


सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, जे कोणी श्रीगुरूचरित्राचे भक्तिभावाने, निष्ठेने श्रवण-पठण करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील."


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'पूर्वजन्मातील रजकाची कथा' नावाचा अध्याय पन्नासावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥


0 comments:

गुरुचरित्र अध्याय एकावन्न

07:53:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक शिष्य सिद्ध्योग्य चरणांना वंदन करून म्हणाला, "यवनराजाने श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना त्याच्या बिदर नगराला गेले होते. तेथून श्रीगुरू गाणगापुरात परत आले असे तुम्ही यापूर्वी सांगितलेत. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "बाळा, आता पुढे काय झाले ते मी तुला सांगतो. ती विशेष घटना तू लक्षपूर्वक ऐक. ही कथा श्रवण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात." श्रीगुरू यवनराजाला त्याच्या नगरात भेटून गाणगापुरात परत आले. परत आल्यावर त्यांनी एक विचार पक्का केला, की आता हा पसारा खूप वाढला आहे. लोकांना खरा परमेश्वर समजावा. नुसती व्यक्तीची पूजा असू नये. आता आपण गुप्त होऊन अवतारसमाप्ती करावी. मग त्यांनी आपल्या शिष्यांना व भक्तांना आपण श्रीशैल्यपर्वतावर जाऊन तेथेच गुप्तपणे राहणार असे सांगितले. प्रस्थानाची सर्व तयारी झाली. श्रीगुरू शिष्यांसमवेत श्रीशैलयात्रेला म्हणून निघाले. त्यावेळी भक्तजनांना अतिशय वाईट वाटले. ते श्रीगुरुंच्या चरणी पडून म्हणाले, "स्वामी, आम्हाला सोडून आपण का बरे जाता ? स्वामी, तुम्ही आम्हा भक्तांसाठी कामधेनू आहात. तुमच्या केवळ दर्शनाने सर्व पातके दाही दिशांना पळून जातात. तुमच्या कृपेने आमच्या सर्व कामना पूर्ण होतात. आई आपल्या बालकाचा कधी त्याग करते का ? तुम्हीच आमचे माता-पिता सर्व काही आहात. आमच्यावर कृपा करा. आम्हाला सोडून जाऊ नका."


सर्व भक्तांनी अशी परोपरीने विनवणी केली असता श्रीगुरू त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने म्हणाले, "भक्तजन हो, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही. मी याच गाणगापुरात, नित्य अमरजा संगमात स्नान करून मठातच गुप्तपणे राहीन, याविषयी तुम्ही निश्चिंत राहा. जे लोक माझी नित्य भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईन. मात्र जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मी शैल्य्यात्रेला जात आहे. मी प्रातःकाली कृष्णानदीत स्नान करीन. कृष्णा-पंचगंगा संगमावर औदुंबरक्षेत्री अनुष्ठान करीन. संगमावर पुन्हा स्नान करीन. मध्यान्हकाळी मठात येईन. तेथे मी भक्तांच्या पूजेचा स्वीकार करीन. तुम्ही कसलही चिंता करू नका. आम्ही गाणगापुरात निरंतर वास्तव्य करणार आहोत. जे लोक आमची भक्ती करतात, आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात ते आम्हाला विशेष प्रिय आहेत. त्यांच्या सर्व कामना, इच्छा त्वरित पूर्ण होतील. हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे. अमरजा संगमावर जो अश्वथवृक्ष आहे तो कल्पवृक्ष आहे. त्याची नित्य पूजा करा म्हणजे तुमच्या मनात ज्या इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील. मी मठात माझ्या निर्गुण पादुका ठेवीत आहे. अश्वत्थाची पूजा करून मठात येत चला व तेथे माझ्या निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करीत जा. विघ्नहर्त्या चिंतामणी श्रीगणेशाची पूजा करा. त्यामुळे तुमच्या सर्व चिंता नाहीशा होऊन इच्छित फळ मिळेल. आमची दररोज त्रिकाल आरती करावी म्हणजे सर्व कार्ये सिद्धीला जातील." अशा रीतीने सर्व भक्तजनांची समजूत घालून, त्यांना आशीर्वाद देऊन श्रीगुरू नृसिंहसरस्वती श्रीशैल्ययात्रेसाठी निघाले. सर्व भक्त त्यांना प्रेमाचा निरोप देऊन मठात परत आले. त्यावेळी त्यांना श्रीगुरू मठातच आहे असे दिसले.


श्रीगुरू आपल्या चार शिष्यांसह पाताळगंगेच्या तीरावर आले. त्यांनी शिष्यांना सांगितले, " माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा, मी या नदीतून श्रीशैल्यपर्वतापर्यंत जाईन व मल्लिकार्जुनाशी ऐक्य साधून राहीन." श्रीगुरुंनी असे सांगताच शिष्यांनी शेवंती, कमळ, मालती, कल्हार अशी फुले केळीच्या पानात गुंडाळून आणली. त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ते गंगेच्या पवित्र पाण्यावर ठेवले. मग श्रीगुरू त्यांना म्हणाले, "आता तुम्ही गावात परत जा."


हे ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले. श्रीगुरू त्यांना समजावीत म्हणाले, "आम्ही गाणगापुरातच मठात असू. तुम्हाला दर्शन देऊ. कसलीही चिंता करू नका. लौकिकदृष्ट्या आम्ही जात आहोत असे दिसले तरी आम्ही नित्य भक्तांच्या घरीच असू, याची खात्री बाळगा." असे सांगून श्रीगुरू उठले व नदीतील आसनावर जाऊन बसले. आता मी निजस्थानी जातो. तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो." असे ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीत गुरु होता. बहुधान्य नाम संवत्सर होते. त्या दिवशी माघ वद्य प्रतिपदा होती. वार शुक्रवार होता. शिशिरऋतू होता.


श्रीगुरू निजानंदी बसले, त्यावेळी ते शिष्यांना म्हणाले, "आम्ही निजधामाला जात आहोत. तेथे पोचल्याची खूण म्हणून शेवंतीची चार प्रसादपुष्पे प्रवाहात वाहत येतील. ती तुम्ही घ्या. आमची नित्य पूजा करीत जा. त्यामुळे तुमच्या घरी अखंड लक्ष्मी राहील. आम्हाला गायन खूप आवडते. ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करतो. आमचे जो नेहमी स्तोत्रगान करतो त्याला कसलीही व्याधी येणार नाही. त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल. त्याला पुत्रपौत्र प्राप्त होतील. तो निरामय शतायुषी होईल. जे कोणी आमचे चरित्र श्रवण-पठण करतील त्यांच्या घरी लक्ष्मी नांदेल. याविषयी संदेह नसावा." असे आपल्या शिष्यभक्तांना आश्वासन देऊन श्रीगुरू एकाएकी गुप्त झाले.


सगळे भक्त तेथेच चिंता करीत बसले त्यावेळी एका नावेतून काही नावाडी आले. ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, "आम्ही पैलतीरी होतो. तेथे आम्ही श्रीगुरुंना पाहिले. संन्यासी वेषात असलेल्या त्यांनी हातात दंड धारण केला होता. त्यांनी स्वतःचे नाव श्रीनृसिंहसरस्वती असे सांगितले. त्यांनी तुम्हाला एक निरोप सांगितला आहे. "आम्ही कर्दळीवनी जात असलो तरी नित्य गाणगापुरातच असू." त्यांनी जाताना असेही सांगितले की, तुम्ही आता तुमच्या घरी जावे. वंशोवंशी माझी भक्ती करीत सुखाने राहावे. प्रसादपुष्पे आल्यानंतर ती शिष्यांनी घ्यावीत असे आम्हाला सांगून श्रीगुरू एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडी असे सांगत होते तोच प्रसादपुष्पे वाहत आली. तू चार शिष्यांनी घेतली.


सिद्धयोगी असे सांगत होते त्यावेळी नामधारकाने विचारले, "ते चार प्रमुख शिष्य कोण ?" त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "श्रीगुरुंचे अनेक शिष्य होते. श्रीगुरुंनी त्यांना संन्यासदीक्षा देऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पाठविले. त्यातील कृष्णसरस्वती, बालसरस्वती व उपेंद्रसरस्वती व माधवसरस्वती या चौघांनाही तीर्थयात्रेला पाठविले. श्रीगुरू निजधामाला गेले त्यावेळी सायंदेव साखरे, कवीश्वर नाव दिलेला नंदीब्राम्हण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे चौघेजण त्यांच्याबरोबर होतो. आम्ही ती पुष्पे काढून घेतली. ते पुष्प आजही माझ्याकडे आहे. त्याची मी नित्य पूजा करतो." असे सांगून सिद्धयोग्यांनी नामधारकाला ते शेवंतीचे पुष्प दाखविले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "नामधारका, श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचा महिमा हा असा मोठा फार अद्भुत, अपूर्व आहे. तो अपार आहे. त्यातील फार मोठा भाग मी तुला सांगितला. नामधारका, साक्षात कामधेनू असेलेले श्रीगुरुचरित्र मी तुला सविस्तर सांगितले. आता तुझे दैन्य, दारिद्र्य पळून गेले असेच समज. हे श्रीगुरूचरित्र लिहून काढतील किंवा याचे जे श्रवण-पठण करतील ते लक्ष्मीवंत होतील. त्यांना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होईल. त्यांच्या मातृ-पितृ उभयपक्षी महानंद होईल. त्यांना पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल."


असे हे श्रीगुरुचरित्र सिद्धांनी नामधारकाला सांगितले. ते ऐकून नामधारकाला परमानंद प्राप्त झाला. त्याच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण झाल्या.


ग्रंथकार सरस्वती म्हणतात, "नामधारकाने या श्रीगुरुचरित्राचे जे मोठ्या भक्तिभावाने श्रवण-पठण करतील. त्यांना धर्मार्थकाममोक्ष हे चारी पुरुषार्थ प्राप्त होतील. श्रीगुरू नृसिंहसरस्वती त्यांचे वंशोवंशी रक्षण करतील, म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्यांना वंदन करून सांगतात, "श्रोते हो ! सर्व इच्छा, कामना पूर्ण करणाऱ्या या श्रीगुरूचरित्राचे तुम्ही नित्य भक्तिभावाने, श्रद्धेने श्रवण-पठण करा. तुमचे सदैव कल्याण होईल."


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरू नृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन' नावाचा अध्याय एकावन्नावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

0 comments:

श्रीगुरूचरित्र अवतरणिका

07:50:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 


ॐ ओमकारा गुरुदेव दत्त 

सद्गुरू रामचंद्र महाराज की जय 

सद्गुरु ॐ स्वामी महाराज की जय

गुवरुचरित्र

अध्याय बावन्नावा


श्रीगुरूचरित्र अवतरणिका

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 

श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः ।। ॐ।।

श्रोते हो ! सावधानचित्ताने ऐका ! श्रीगुरूचरित्राचे एकावन्न अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली . तो निजानंदात मग्न झाला. श्रीगुरूचरित्रामृत सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव मिर्माण झाले. सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले. कंठ दाटून आला. सर्वांगाला कंप सुटला. त्याच्या डोळ्यांवाटे प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराची हालचाल बंद झाली. तो समाधिसुखात आनंदाने डोलत होता. ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला.


त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले. त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले, "बाळ, नामधारका, तू खरोखर भवसागर तरुन गेला आहेस; पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील. मग लोकांचा उद्धार कसा होईल ? तू वारंवार विचारलेस म्हणूनच मला श्रीगुरूंची अमृतवाणी आठवली. ती त्रिविधतापांचा, सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. तुझ्यामुळेच मला श्रीगुरुचरित्र आठवले. तुही ते एकाग्रचित्ताने श्रवण केलेस." सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले. तो हात जोडून उभा राहिला व सिद्धयोग्यांना म्हणाला, "स्वामी, तुम्ही खरोखर कृपातरू आहात. या विश्वाचे तुम्ही आधार आहात. तुमच्या कृपेनेच संसारसागर पार करता येतो. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत.


आता माझी एक विनवणी आहे अमृतापेक्षा श्रेष्ठ अशा श्रीगुरूचरित्रामृताची अवतरणिका मला सांगा. आपण सांगितलेल्या श्रीगुरूचरित्रामृतात भक्तजनांच्या चितवृत्ती बुडून गेल्या असल्या, तरी मी अद्यापही अतृप्त आहे. मला श्रीगुरूचरित्रामृत पाजून आनंदसागरात ठेवा. अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात, त्याप्रमाणे श्रीगुरूचरित्रामृताचे सार मला सांगा."


नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, "बाळा, तुझी श्रीगुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो. त्यासाठी मी तुला श्रीगुरूचरित्राची अवतरणिका सांगतो, ती ऐक.


पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे. भक्तजनांना श्रीगुरूमूर्तीचे दर्शन घडले आहे.


दुसऱ्या अध्यायात ब्रम्होत्पत्ती सांगितली असून चारी युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. त्याच अध्यायात गुरुमाहात्म्य व संदीप आख्यान आले आहे.


तिसऱ्या अध्यायात अंबरीष आख्यान सांगितले आहे.


चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासठी आलेले त्रैमूर्ती तिची बालके होतात, ती त्रैमूर्ती श्रीदत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे.


पाचव्या अध्यायात श्रीदत्तात्रेयांच्या श्रीपादश्रीवल्लभ अवताराची कथा आली असून, सहाव्या अध्यायात गोकर्णमहिमा व महाबळेश्वरलिंग स्थापनेची कथा सांगितली आहे.


आठव्या अध्यायात शनिप्रदोषव्रत माहात्म्य वर्णिले असून, नवव्या अध्यायात श्रीगुरुंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे.


दहाव्या अध्यायात कुरवपूर क्षेत्र महिमा सांगितला असून. वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे.


अकराव्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्रीनृसिंहसरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्रीगुरू नरहरी बालचरित्रलीला वर्णन केले आहे.


बाराव्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग, काशीक्षेत्री संन्यास ग्रहण व गुरु-शिष्य परंपरा हे विषय आले आहेत.


तेराव्या अध्यायात श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे करंजागावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राम्हणावर श्रीगुरुंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत.


चौदाव्या अध्यायात क्रूरयवन शासन व सायंदेव वरप्रदान कथा आल्या आहेत.


पंधराव्या अध्यायात श्रीगुरुंचे वैजनाथक्षेत्री गुप्त वास्तव्य व तीर्थयात्रा निरुपण आले असून, सोळाव्या अध्यायात गुरुभाक्तीचे माहात्म्य, धौम्य शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत.


सतराव्या अध्यायात भुवनेश्वरीला जीभ कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलास श्रीगुरू ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून,


अठराव्या अध्यायात अमरापूरमाहात्म्य सांगून श्रीगुरूकुपेने एका ब्राम्हणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे.


एकोणिसावा अध्यायात औदुंबरमाहात्म्य, नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत.


विसाव्या अध्यायात ब्राम्हण स्त्रीची पिशाचबाधा कशी दूर केली हे सांगितले आहे.एकविसाव्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्रीगुरुंनी एका मृतबालकाला सजीव केल्याची कथा असून,


बाविसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी एक वांझ म्हैस दुभती केल्याचा चमत्कार सांगितला आहे.


तेविसाव्या अध्यायात श्रीगुरूगाणगापुरात येतात व एका ब्रम्हराक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून, चोविसाव्या अध्यायात त्रिविक्रमभारतीचा उद्धार केल्याची कथा आहे.


पंचविसाव्या अध्यायात गर्विष्ठ ब्राम्हणांचा 'जयपत्राविषयी हट्ट' हा प्रसंग सांगितला असून, सव्विसाव्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे.


सत्ताविसाव्या अध्यायात उन्मत्त ब्राम्हणांना श्रीगुरुंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत.


अठ्ठाविसाव्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आली आहे, एकोणतिसाव्या अध्यायात भस्ममाहात्म्य सांगितले आहे.


तिसाव्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रम्हचाऱ्याने तिला केलेला उपदेश हे विषय आले असून,


एकतिसाव्या अध्यायात पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला आहे.


बत्तिसाव्या अध्यायात विधवेचा आचारधर्म सांगितला असून, मृत ब्राम्हण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे.


तेहतिसाव्या अध्यायात रुद्राक्षमाहात्म्य व सुधर्मतारक आख्यान आले आहे.


चौतिसाव्या अध्यायात रुद्रध्यायात सांगितले आहे. पस्तिसाव्या अध्यायात कच-देवयानी कथा व सोमवार व्रत व सीमंतिनी आख्यान आले आहे.


छत्तिसाव्या अध्यायात परान्न्दोष, धर्माचरण हे विषय आले असून, सदतिसाव्या अध्यायात गृहस्थाश्रमाचा आचारधर्म सांगितला आहे.


अडतिसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी भास्कर ब्राम्हणाची लाज कशी राखली हे सांगून, एकोणिसाव्या अध्यायात अश्वत्थमाहात्म्य व साठ वर्षांच्या वंध्येस संतानप्राप्ती झाल्याची कथा आहे.


चाळीसाव्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून, शिवभक्त शबरकथा सांगितली आहे.


एकेचाळीसाव्या अध्यायात सायंदेवाची गुरुसेवा, काशीयात्रा व त्वष्टाख्यान हे विषय आले आहेत.


बेचाळीसाव्या अध्यायात अनंतव्रत कथा आली असून,


त्रेचाळिसाव्या अध्यायात विमर्षण राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुन हे विषय आले आहेत.


चव्वेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी नंदीब्राम्हणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे.


पंचेचाळीसाव्या अध्यायात भक्तवत्सल श्रीगुरुंनी आपल्या भक्तांसाठी आठ रूपे धारण केल्याची कथा सांगितली आहे.


सत्तेचाळीसाव्या अध्यायात श्रीगुरुंनी एका शुद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे. अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात अमरजासंगम व अष्टतीर्थमाहात्म्य सांगितले आहे.


एकोणपन्नासाव्या अध्यायात गुरुमाहात्म्य व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे.


पूर्वजन्मातील एक श्रीगुरुभक्त यवन वंशात जन्मास येतो व श्रीगुरुंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो ती सविस्तर कथा पन्नासाव्या अध्यायात आली आहे.


एकावन्नाव्या अध्यायात श्रीगुरूनृसिंहसरस्वतींचे निजानंदगमन, अवतार-समाप्ती झाल्याची कथा दिली आहे.


सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरूचरित्र अनंतअपार आहे. त्यातून मी तुला केवळ एकावन्न अध्याय सांगितले आहे. त्यांची अवतरणिका तुला सांगितली. नामधारका, श्रीगुरू अवतार-समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल; पण ते आजही गाणगापुरात आहेत हे लक्षात ठेव. या कलियुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे हे पाहून श्रीगुरू गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका, मी सांगितलेल्या श्रीगुरूचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवण-पठण करतील त्यांना श्रीगुरू नक्कीच भेटतील. आपला जसा भाव असेल तसे फळ श्रीगुरू देतात. नामधारका, तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस, त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला. ज्यांनी पूर्वीच श्रीगुरुचरित्राचे श्रवण-पठण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल. इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्रीगुरुचरित्र पठण-श्रवणाची इच्छा होईल." सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो हात जोडून म्हणाला, "स्वामी, आता या श्रीगुरूचरीत्राचा पारायण विधी मला सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा." त्यावर सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकार होणार आहे. आता तुला पारायणाविषयी सांगतो. आपले अंतःकरण पवित्र असताना दररोज शुचिर्भूतपणे जमेल तेवढे श्रीगुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार पारायणविधी केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते. दिनशुद्धी पाहून - म्हणजे शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नानसंध्या करावी. जेथे पारायण करावयाचे ती जागा पवित्र करावी. रांगोळ्या काढाव्यात. देशकालादी संकल्प करून ग्रंथरुपी श्रीगुरुंचे यथाविधी पूजन करावे. ब्राम्हणाचीही पूजा करावी. प्रथमदिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे.


वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये. ब्रम्हचर्यादी नियम कसोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा (समई इ.) प्रज्वलित असावा. देव, ब्राम्हण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा.


प्रतिदिवशी वाचावयाची अध्यायसंख्या -


पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचावेत.


दुसऱ्या दिवशी आठ ते अठरा अध्याय वाचावेत.


तिसऱ्या दिवशी एकोणीस ते अठ्ठावीस अध्याय वाचावेत.


चौथ्या दिवशी एकोणीस ते चौतीस अध्याय वाचावेत.


पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय वाचावेत.


सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत.


सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न अध्याय वाचावेत.


शेवटी अवतरणिका ( बावन्नावा अध्याय ) वाचावी.


रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांगपूजन करावे. श्रीगुरू नृसिंहसरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मग फलाहार करावा. सात दिवस रात्री जमिनीवर झोपावे. सदैव शास्त्राधारे पवित्र, व्रतस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राम्हण-सुवासिनीस भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे.


अशारीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरुंचे दर्शन होते. भूतप्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते.


सिद्ध्योग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. 'आपण धन्य झालो. कृतकृत्य झालो.' असे म्हणून त्याने सिद्ध्योग्यांच्या चरणांवर मस्तक टेकले. सिद्ध्योग्यांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन एकावन्न रांजण भरले व याचकभक्तांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासठी हात पसरून याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ, नामधारक हा चातक. त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला.


अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीगुरूचरित्र अवतरणिका' नावाचा अध्याय बावन्नावा समाप्त.


॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

0 comments:

अनिरुद्ध असता पाठी

07:46:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 अनिरुद्ध असता पाठी,

खुले आम्हा मैदान

डाळींबाचे दाणे भरवी,

नसे कुठले बंधन

उघडे आम्हा हे मळे कर्माचे 

 सेवा रूप धाक असो

क्षणभर पिंजऱ्यात राहुन  

भोगु भोग प्रारब्ध आमचे 

आतही दाणे ,बाहेरही दाणे 

आमच्या नशिबी पिंजरा नसे 

हे फक्त बापुच जाणे 

कसे होते कर्म माझे 

फळ मात्र तोच देतो 

सोलून डाळींब मला 

बापुच माझा मला भरवितो

त्याचेच सारे कष्ट... 

त्याचीच ही इच्छा... 

कृपे अनिरुद्ध... 

डाळिंब खातों... 

आशिष फक्त बापुंचा.... 


श्रीराम 

अंबज्ञ


आशिषसिंह देशपांडे 

वाळुज उपासना केंद्र 

0 comments:

नाशिक

07:44:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 नाशिक हे पाहण्याचं नाही अनुभवण्याचं शहर आहे, पूर्ण वाचा अभिमान च वाटेल नाशिककर असल्याचा,,,,,,


शूर्पणखेचं कापलेलं “नाक” ते अकबराचं घर : नाशिक शहराबद्दल अचाट अज्ञात गोष्टी....


नाशिक! महाराष्ट्रातील एक शांत सुंदर व आल्हाददायक वातावरण असलेले टुमदार शहर! नाशिक म्हटलं की आपल्याला आठवतात नाशिकची गोड द्राक्षं!


शिवभक्तांना आठवतं ते नाशिकपासून जवळ असलेलं त्र्यंबकेश्वर हे देवस्थान, जगदंबेच्या भक्तांची साडेतीन शक्तीपीठांची यात्रा नाशिकजवळच्या वणी येथील गडावर असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. शिवाय ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असलेले काळाराम मंदिरसुद्धा नाशकातच आहे.


तसेच मंदिरांचे शहर असलेल्या नाशकाला दक्षिणेचे हरिद्वार असेही काही लोक म्हणतात, कारण गोदावरी नदी जिला दक्षिणेतील गंगा मानले जाते ती येथे नाशिकातच आहे.


ह्याचप्रमाणे पर्वाच्या काळात भरतो तो प्रसिद्ध कुंभ मेळा नाशिकला त्र्यंबकेश्वरला दर १२ वर्षांनी भरतो.


त्रेता युगात प्रभू श्रीराम ,सीतामाई व लक्ष्मण हे वनवासाच्या काळात नाशिकातल्या पंचवटी येथे काही काळ वास्तव्यास होते असे म्हणतात. आपले स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा नाशिकचेच आणि चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके सुद्धा नाशिकचेच!


मद्यप्रेमींची आवडती वाईनसुद्धा इथेच तयार होते. नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हणतात.


नाशिकबद्दल ह्या गोष्टी तर जवळजवळ सर्वांनाच ठावूक असतील. मात्र ह्या शहरात अशाही काही गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल नाशिककर सोडले तर इतर शहरातील अनेकांना माहिती नाही. आज आपण देवळांचे शहर असलेल्या नाशिक शहराबद्दल अशाच काही अज्ञात गोष्टी जाणून घेणार आहोत.


नाशिक रामायणाच्या आधीच्या काळात ‘पंचवटी’ म्हणून ओळखले जात असे. तसेच काही काळासाठी नाशिकला ‘गुलशनाबाद’ असेही नाव होते. असे म्हणतात की,


प्रभू श्रीराम ह्यांच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखा हिचे नाक नाशकातच कापले होते.


कृतयुगात नाशिकला ‘त्रिकंटक’ असे नाव होते, तर द्वापारयुगात नाशिकचे नाव ‘जनस्थान’ असे होते. नंतर कलियुगात ह्या शहराचे नाव ‘नवशीख’ किंवा ‘नाशिक’ असे पडले. प्रसिद्ध संस्कृत कवी कुलगुरू कालिदास तसेच आदिकवी महर्षी वाल्मिकी व भवभूती ह्यांनीही ह्या शहरात वास्तव्य केले असे म्हणतात.


इसवी सन पूर्व १५० व्या शतकात नाशिकमध्ये देशातील सर्वात मोठी बाजारपेठ होती असे म्हणतात. पंधराव्या शतकात नाशिक मुघलांच्या ताब्यात गेले व त्यांनी ह्याचे नामकरण गुलशनाबाद असे केले.


बादशहा अकबरसुद्धा नाशिकमध्ये काही काळासाठी वास्तव्यास होता. त्याने नाशिकबद्दल त्याच्या इन-ए-अकबरी ह्या पुस्तकात नाशिकचे वर्णन केले आहे.


तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही नाशिक प्रसिद्ध होते. तेव्हा नाशिकला “शूरवीरांची भूमी” असे म्हटले जात असे. नाशिकला “नाशिक” हे नाव १८१८ मध्ये पेशव्यांनी दिले.


पेशव्यांनंतर नाशिक ब्रिटीशांच्या ताब्यात गेले आणि १८४० साली त्यांनी पहिल्या काही आधुनिक वाचनालयांपैकी एक वाचनालय नाशिक येथे सुरु केले.


प्राचीन काळी मौर्य साम्राज्यात नाशिक सुद्धा होते. ह्याचे पुरावे चंद्रपूरजवळ देवटेक येथे सापडलेल्या शिलालेखात आहेत. ह्या शिलालेखात राष्ट्रकूट साम्राज्य व भोज राजाच्या साम्राज्याविषयी लिहिले आहे. भोज राजाच्या साम्राज्यात विदर्भ होता, तर नाशिक व त्याजवळच्या प्रदेशावर मौर्यांचे राज्य होते.


अशोक राजाच्या मृत्युनंतर ५० वर्षात पश्चिम महाराष्ट्रात सातवाहनांचे राज्य आले. सिमुका ह्या राजाने हे साम्राज्य स्थापन केले. त्याच्यानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा राजगादीवर बसला. ह्याच्याच काळात नाशिकवर सातवाहनांचे राज्य होते.


नाशिकजवळच्या एका गुहेत ह्या कृष्ण राजाने एक शिलालेख कोरला आहे. ही गुहा राजाने खास बुद्ध भिख्खूंसाठी खोदून घेतली होती. ह्या राजानंतर सातकर्णी राजाचे येथे राज्य होते .


त्याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य त्याच्या पत्नीने म्हणजेच नयनिका/नागनिका सातकर्णी ह्या राणीने चालवले. ह्यांना वेदिश्री व शक्तीश्री ही दोन मुले होती. नाणेघाटात सापडलेल्या शिलालेखाप्रमाणे वेदिश्री हा राजा अत्यंत शूर व एकमेवाद्वितीय असा योद्धा होता. त्याला दक्षिणपथाचा म्हणजेच दक्खनचा देव असे म्हणत असत.


ह्या राजाच्या राजवटीनंतर काही वर्षात सातवाहन साम्राज्यापैकी माळवा, नाशिक व काठीयावाड ह्या प्रदेशावर शक क्षत्रपांचे राज्य आले. नहपान हा शक क्षत्रप राजा होता. ह्या राजाने तेव्हा नाशिक बरोबरच कोकण, पुणे आणि महाराष्ट्रातील काही गावे व मध्य भारतातील काही प्रदेशावर राज्य केले. उत्तरेत त्याचे राज्य अजमेरपर्यंत पसरलेले होते.


ह्या नहपान राजानेच नाशिकजवळ असलेल्या पांडवलेणी उत्खनन करून शोधून काढल्या.


ह्याचा जावई रिषभदत्त हा पंडू लेण्यांच्या गुहेत चिंतन करत असे. रिषभदत्ताचा विवाह नहपानाच्या मुलीशी झाला होता. नाशिकच्या गुहेत सापडलेल्या शिलालेखांमध्ये ह्या रिषभदत्ताच्या कार्याविषयी माहिती दिलेली आहे. ह्याने उत्तर महाराष्ट्र व कोकण ह्या प्रदेशात राज्य केले.


ह्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी राजाने नहपानाचा पराभव करून त्याचे साम्राज्य मिळवले.


हे युद्ध नाशिक जवळच्याच एका गावात झाले. गौतमीपुत्र सातकर्णी नंतर ह्या भागावर यज्ञश्री सातकर्णी ह्या राजाने राज्य केले. ह्या राजाच्या साम्राज्यात संपूर्ण महाराष्ट्र होता. ह्या राजाच्या राज्यातील शिलालेख व नाणी बऱ्याच ठिकाणी सापडली आहेत. ह्या राजाचे साम्राज्य कोकणापासून ते आंध्र पर्यंत पसरलेले होते.


सातवाहन राज्यकर्ते उत्तम राज्यकर्ते होते. त्यांनी आपापल्या काळात प्रजेसाठी खूप चांगले कार्य केले.


ह्यांच्या काळात नाशिक अत्यंत श्रीमंत व समृद्ध शहर होते. ह्या काळात नाशिक व्यापाराचे मुख्य केंद्र होते. नाशिकचे रेशीम ह्या काळात युरोपपर्यंत प्रसिद्ध झाले होते. मार्को पोलोने हे असे रेशमाचे कापड बघदाद मध्ये बघितले. ह्या कापडाला तिकडे नॅक किंवा नॅसीच असे नाव होते.


हे मूळ नाशिकचे होते. हेच नाशिकचे रेशमी कापड चौदाव्या शतकात nac, nacquts, nachis, naciz व nasis ह्या नावांनी युरोपमध्ये प्रसिद्ध होते.


ह्यानंतर नाशिकवर अभिरांनी राज्य केले. नाशिकच्या एका शिलालेखात माधुरीपुत्र ईश्वरसेन ह्या अभिर राजाबद्दल उल्लेख आहे. हा एक अभिर राजा होता व शिवदत्त राजाचा मुलगा होता. ज्या काळात ह्या राजाने राज्य केले त्याला छेडी किंवा कलचुरी असे म्हणतात. ह्या कालखंडात नाशिकचे नाव त्रिरश्मि असे होते.


ईश्वरसेन राजाने नाशिकमधील गुहांपैकी नवव्या गुहेत एक शिलालेख लिहिला आहे. ह्या काळात त्रिरश्मी येथील विहारांत राहणाऱ्या अनेक बुद्ध भिख्खूंना आजारावर औषधे दिल्याची नोंद शिलालेखात सापडते.

ह्यानंतर ह्याठिकाणी त्रैकुटक राजांचे राज्य होते. इसवी सन ४९० मध्ये ह्यांनी हा प्रदेश जिंकला. इंद्रदत्त व व्याघ्रसेन ह्या राजांचा उल्लेख नाशिकजवळ व गुजरातमध्ये सापडलेल्या शिलालेखांत व नाण्यांवर आढळतो. हे राज्य वाकाटक राजा हरीषेणाच्या अधिपत्याखाली होते.


त्याच्या पाडावानंतर इसवी सन सहाव्या शतकात विष्णूकुंडीण राजा माधववर्मन पहिला ह्याचे राज्य आले. सर्वप्रथम विदर्भावर ह्याचे राज्य होते परंतु वाकाटक राजाच्या पाडावानंतर त्याने पश्चिम महाराष्ट्रापर्यंत राज्याचा विस्तार केला.


ह्यानंतर येथे कलचुरी राजा कृष्णराज ह्याचे राज्य होते. ह्यानंतर त्याचा मुलगा शंकरगण ह्याने राज्यकारभार सांभाळला. ह्या राजाचा ताम्रपट नाशिक येथे सापडला आहे.


कृष्णराजानंतर त्याचा मुलगा बुद्धराजा गादीवर आला असा ह्या ताम्रपटात उल्लेख आहे. ह्या राजाने माळवापासून ते औरंगाबाद व नाशिकपर्यंत साम्राज्याचा विस्तार केला होता अशी नोंद आहे. ह्यानंतर चालुक्य, यादव तसेच मुघलांच्याही साम्राज्यात नाशिक होते. त्यानंतर मराठ्यांनी नाशिक जिंकले.


स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा नाशिकचा मोठा सहभाग आहे.अवघे सतरा वर्षीय अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन ह्याचा नाशिकच्याच विजयानंद थियेटर मध्ये वध केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी नाशिकच्याच काळाराम मंदिरात दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.


असे हे नाशिक शहर प्राचीन इतिहासापासून तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या इतिहासाची साक्ष देते.


नाशिक ह्या शहराला अगदी कृतयुगापासूनचा इतिहास आहे. ह्या शहराने अनेक स्थित्यंतरे बघितली आहेत. इतिहासाची साक्ष देत अनेक प्राचीन देवळे, लेणी अंगाखांद्यावर मिरवत आजही हे शहर दिमाखात उभे आहे.😀

0 comments:

स्वामी कथा

07:43:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 || स्वामी लीला ||


अक्कलकोट मध्ये स्वामींलीला सुरू होत्या... असंख्य लीलांचे अभिव्यक्ती होत होती.. अनेक पात्र स्वामींच्या दरबारात होते.. प्रत्येक पात्राचे एक विशिष्ट प्रयोजन होते.. ह्यात आपण कसे जीवन घडवावे आणि कसे असू नये ह्याचे स्पष्ट मार्गदर्शन दडलेले होते.. ह्यातील एक पात्र म्हणजे सुंदराबाई... सुंदरबाई ही स्वामी चरित्र मधील एक असे पात्र की जे आपल्या मनातील नकारात्मक.. गोष्टींचे प्रतिनिधित्व करत होती.. सुंदराबाईचा स्वभाव हा चिडखोर.. लोभी होता.. स्वामींना जो कोणी दक्षिना देई.. प्रसाद देई.. त्या सर्व गोष्टी सुंदराबाई लंपास करत.. जर कोणी भाविक आला तर त्याच्या समोर केविलवाणा चेहरा करत.. आणि त्याच्याकडून पैसे घेत.. कपडे घेत.. असे तिचे प्रकार सुरू होते.. ह्यातूनच तेथील सेवक-यांना विनाकारण त्रास देने.. अपमानित करणे.. असे प्रकार सुरु होते.. आता सुंदरबाईचे अतीच होत होते.. आणि म्हणून अनेक सेवेक-यांनी मामलेदार.. कारभारी ह्यांच्याकडे अनेक तक्रारी अर्ज केले होते... परंतु राणीसाहेब आणि सुंदराबाई ह्यांचे चांगले संबंध असल्याने.. सुंदराबाईवर कारवाई करण्याचे कोणाचेच धाडस होत नव्हते.. परंतु ज्याचे जसे कर्म त्याला तसे फळ हा स्वामी नियम आहे.. आणि ह्या नियमाप्रमाणे सुंदराबाईच्या चुकीच्या.. लोभी कर्माचे फळ परिपक्व होत होते.. आणि स्वामी महाराज सुंदराबाईस सतत संकेत देत होते.. जसे एके दिवशी सुंदराबाई खारका वाटत होती.. तेव्हा स्वामी बोलले “अग.. खारका वाटू नको बरे.. पुढे लींब्याकडून मागून घ्याव्या लागतील..” परंतु बाईस स्वामींचे संकेत काही समजत नव्हते.. ह्यासह असेच एके दिवशी बावडेकर पुराणिकांनी एक जरी काठी छाटी आणली होती.. ती रंगवून स्वामींच्या अंगावर घालण्यासाठी सुंदराबाईकडे दिली.. आणि सुंदरबाईने स्वामींच्या अंगावर घातली असता.. स्वामींनी परत तिच्या अंगावर टाकली.. तेव्हा बाईने पुन्हा महाराजांना घातली.. तेव्हा स्वामींनी पुन्हा तिच्या अंगावर टाकली आणि बोलले “अगं.. पुढे छाटी मिळायची नाही.. आताच पांघरून घे..!! ” खरतर स्वामी तिला स्पष्ट संकेत देत होते.. जर कोणी फळ फळफळाव आणला तर स्वामी तिला बोलत.. “ अगं.. खाऊन घे... तुला पुन्हा खायला भेटणार नाही..!! ”. असेच एकदा राणीसाहेब स्वामींच्या दर्शनाला आल्या असता... स्वामी त्यांना बोलले..“ आज पर्यंत सुंदराबाईस आम्ही सांभाळले.. आता या पुढे तुम्ही सांभाळा !! ” त्यावर राणी साहेबांनी “ ठीक आहे स्वामी.. आम्ही सांभाळतो ” असे उत्तर दिले.. परंतु राणीसाहेबास ह्याचा अर्थ समजला नाही.. असो. थोडक्यात सुंदराबाईस स्वामी महाराज सतत संकेत देत होते.. परंतु अहंकाराने सुंदराबाईची भावनिक संवेदना नाहीश्या झाल्या.. तिचे डोळे लोभाने आंधळे झालेले.. कान तिरस्काराने बहिरे झालेले.. असल्याने स्वामींचे संकेत तिला काहीच समजत नव्हते.. आणि म्हणूनच तिचा स्वामींच्या दरबारात भक्त मंडळींना तापदायक ठरणारा प्रकार सुरूच होता.. स्वामी भक्त हो !! कोणत्याही गोष्टीची योग्य वेळ यावी लागते असे म्हणतात.. आणि ती वेळ आली.. तेथील तेथील सेवेक-यांनी आता थेट कलेक्टरांना तक्रार केली.. आणि कलेक्टरसाहेबांचा श्री नानासाहेब बर्वे कारभारी ह्यांस बाईला काढून टाकून.. तिच्या खोलीची जप्ती करण्याचा थेट हुकूम आला.. परंतु बाई स्वामींच्या दरबारातील अतिशय जेष्ठ आहे.. तिच्यावर कारवाई केल्यास स्वामींचा कोप होईल.. आणि जर कारवाई न करावी तर इकडनं कलेक्टर साहेबांचा हुकुम आलेला आहे.. आणि ह्या संभ्रमात त्यांचे सात-आठ दिवस गेले.. आणि ह्याच संभ्रमित मनस्थित असतांना एके दिवशी बर्वे कारभारी स्वामींच्या दर्शनाला आले.. स्वामींचे दर्शन घेऊ लागले.. तेव्हा स्वामीनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले " काय रे.. असाच हुकुम बजावातोस का ?" स्वामींनी असे बोलताच नानासाहेब बर्वे कारभारी ह्यांस.. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला.. आणि त्यांस जरा धीर आला.. पुढे दुसरेच दिवशी बर्वे ह्यांनी फौजदारा बोलावून बाईस दूर करावे असा हुकुम दिला.. आणि ते चार शिपाई सोबत घेवून सुंदरबाईकडे आले. त्या दिवशी महाराज ओंडकरांच्या वाड्यात होती.. सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले.. तेव्हा कारभारी सुंदराबाईस बोलले “आजपर्यंत आम्ही तुम्हाला मातोश्री प्रमाणे मानले..हल्ली आम्ही सरकारचा हुकुम बजावतो आहे.. येथे माझा उपाय नाही.. आपण महाराजांजवळ बसू नये..चालते व्हा.. आपणही आता इतर लोकांसारखे दर्शन घेत जावे.. या पुढे महाराजांजवळ राहण्याची सरकारची तुम्हांस परवानगी नाही..!! ” हे बोलणे ऐकून सर्व प्रथम बाईस हि थट्टा आहे असे वाटले.. आणि ती हसू लागली.. परंतु त्या नंतर फौजदारांनी पुन्हा सांगितले कि “ उठा.. उठा लवकर..!! ” आता सुंदराबाईस वाटले कि, खरोखर हुकुम आलेला आहे.. तेव्हा ती फौजदारांस आणि स्वामींना प्रार्थना करू लागली


परंतु तरीही त्यांनी ऐकले नाही.. शेवटी बाई स्वामींना बोलली “स्वामी तुम्ही तरी फौजदारास कहीतरी सांगा..!! ” परंतु महाराज एकही शब्द बोलले नाही.. आता बाई उठत नाही हे बघुन फौजदार शिपायास बोलले “अरे काय बघता.. बाईस ओढून बाहेर घालवून द्या !!” त्यानंतर शिपाई आले असता.. आता बाईने मोठाच आक्रोश मांडला.. मोठ मोठ्याने रडत बोलु लागली कि , “मी दगडावर डोके फोडून घेईल.. माझा जीव देईल.. ” वगैरे आणि तिने महाराजांचे पाय धरले.. आणि बोलु लागली “महाराज आज पर्यंत आपण माझे मुला प्रमाणे पालन पोषण केले.. आणि आज मला हा प्रसंग आला आहे.. आपणच काहीतरी सांगा !!” स्वामी भक्त हो !! खरतर स्वामींनी तिला ह्यापूर्वीच विविध संकेत देवून सुधारण्याची संधी दिली होती.. आता स्वामी काय सांगणार.. स्वामींनी शिपायाकडे बघितले आणि बोलले “ अरे.. काय पाहतोस रे ? ”. स्वामींनी असे बोलताच फौजदारास धीर आला.. आणि त्यांनी बाईला फराफरा ओढून बाहेर नेले.. त्या नंतर बाईच्या खोलीची जप्ती केली.. त्यात बऱ्याच काही गोष्टी सापडल्या.. हरबरे,,तेले..लुगडी..छांटया.. जोडे.. भांडी..गुडगुडी.. वगैरे सर्व जप्त केले.. त्यात पेढे-बर्फी-खारीक वगैरे जिन्नस अक्षरशः कुजून गेले होती.. पुढे जप्त झालेल्या त्या सर्व मालाचा लिलाव झाला आणि आलेला पैसा स्वामींच्या दरबार सेवेसाठी जमा केला.. थोडक्यात पूर्वपुण्याईने सुंदराबाईला स्वामींची सेवा भेटली.. पण पुण्य सांभाळण्यासाठी पुण्यच हवे असते.. आणि सुंदराबाई मात्र इथे नापास झाली.. अहंकार आणि लोभाने ती आंधळी झाली.. आणि स्वामी सेवेपासून दूर गेली..

 बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!


0 comments:

हे एक गिफ्ट 🎁 आहे आनंदी आणि सकारात्मक संकल्पांचं.ईतरांनाही द्या

07:41:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 1)सकाळी उठल्यावर काही मिनिटं स्वतःसोबत घालवेन.(Me time)


⚘2)मी नियमित वेळेत पाणी पिण्याची शिस्त पाळेन.


⚘3)दिवसातला थोडा वेळ निसर्गाच्या सहवासात घालवेन.फुलं,पक्षी,कोवळा सूर्यप्रकाश,हिरवी झाडं,मोकळा वारा यांच्यासोबत काही मिनिटं घालवेन.


⚘4)कामाच्या व्यस्ततेतही प्रत्येक तासाला थोडं स्ट्रेचिंग करुन शरीराची लवचिकता वाढवेन.


⚘5)पौष्टिक आहारासाठी नवनविन रेसिपी शोधून स्वतःची हेल्दी रेसीपीज ची एक वही तयार करेन आहाराचा दर्जा आणखी चांगला करेन.


⚘6)रोज काही मिनिटं सेल्फ हेल्प स्वमदत पुस्तक वाचेन.


⚘7)रोज थोडं चालेन,जीने असतील तर पाय-यांवर चालेन,लिफ्टचा वापर कमी करेन.


⚘8)रोज एकदातरी खळखळून हसण्याचं निमित्त शोधेन.


⚘9)रोज आवडती उत्साह आनंद देणारी गाणी/वाद्य संगीत नक्की ऐकेन,त्यासाठी वेळ काढेन.


⚘10)नियमित लेखन करेन(चार ओळी सुध्दा चालतील)भावना,विचार,अनुभव लिहून काढेन.


⚘11)कामं करताना एक तासानं ब्रेक घेईन,दीर्घ श्वास घेत थोडी क्षणभर विश्रांती घेऊन परत कामाला लागेन.


⚘12)मित्रमैत्रिणींसाठी Friends  आठवड्यातला/महिन्यातला ठराविक वेळ राखून ठेवेन आणि प्रत्यक्ष नक्की भेटेन.


⚘13)घरातल्या लहान मुलांचं ऐकण्यासाठी वेळ आणि कान देईन,त्या वेळात सूचना सल्ले न देता फक्त ऐकेन.


⚘14)नको त्या वस्तू/अडगळ वेळोवेळी दूर करेन,नकारात्मकता साठवून ठेवणार नाही.


⚘15)दिवसभर उत्साही रहाण्यासाठी छान पोशाख करेन,फ्रेश रहाण्याच्या टिप्स शोधेन आणि प्रयत्न करेन.


⚘16)आनंदी रहाण्याची सवय लावून घेईन,नकारात्मक चर्चेत,गाॅसिपमधे सहभागी होणार नाही.


⚘17)नियमित काहीतरी नविन शिकण्याचा प्रयत्न करेन,सराव करेन त्यात पारंगतही होईन. 


⚘18)तक्रार करणं,दोष देणं,चुका शोधणं,जज करणं सोडून गुणांचं कौतुक करेन,चांगलं शोधण्याचा प्रयत्न करेन.


⚘19)दररोज उद्याच्या तयारीसाठी वेळ काढून सज्ज होईन,ऐनवेळची गडबड आणि ताण टाळून कामं करेन.


⚘20)रोज कृतज्ञता व्यक्त करेन,जे आहे त्याला धन्यवाद देईन.


⚘21)भरपूर पुरेशी झोप आणि विश्रांती कोणताही अपराधीभाव मनात न ठेवता घेईन.


⚘22)सकाळी आणि रात्री झोपताना स्वतःला सकारात्मक सूचना affirmations देईन.

©कांचन दीक्षित

0 comments:

🌻 आनंदी पहाट 🌻 शुभदायी पर्व प्रारंभ अपेक्षेची

07:37:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 सुर्योदय ते सुर्यास्त.. तो नित्य होत आहे हजारो वर्षे. याचा हिशेब ठेवण्यासाठी त्याची गणना सुरु झाली. प्रत्येकाची पद्धती वेगळी. जगात आज एक आंग्ल वर्ष समाप्त होत आहे.

        मग या गत वर्षातील घटनांचा उहापोह होणारच. कधी नव्हे एवढया अवघड कोरोना संकटाचा सामना जगाने या वर्षात केलाय. यामध्ये सकारात्मक गोष्ट म्हणजे संकटाशी लढताना जग एक झाले. पण जेव्हा प्रगत राष्ट्रेही या लढाईत हतबल ठरली होती, तेव्हा भारताने जगाला मदत केली. जगातील प्रत्येक जीव हा आमच्यादृष्टीने शिव आहे त्याची मदत करणारच ही आमची संस्कृती. भारताने या संकटात आत्मनिर्भर होत जगाच्या मदतीत अभूतपूर्व योगदान दिलेय.

        जरी हा विषाणू कितीही मायावी वागला तरीही त्याचा आम्ही धैर्याने सामना केलाय, याचे कारण भारतीय संस्कृतीची जीवनशैली. भारतीय संस्कृतीच्या जीवनशैलीत सणवाराच्या निमित्य बदलत्या हवामानात प्राप्त होणारा सुयोग्य आहार यामुळेही प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत झाली. तसेच इथे डोंगर वृक्षवेली.. पशूंचे महत्व ओळखून त्यांची होणारी  जोपासना आणि शासन नियमांचे.. आदेशांचे पालनही महत्त्वाचे ठरलेय. सर्वांसाठी देशहीत.. 'मानवता' धर्मच सर्वोच्च आहे हे देशवासियांनी सिद्ध केलेय. 

        आजचा सूर्यास्त अमंगल आठवणी गिळंकृत करणार. उद्याचा अरुणोदय सर्वांच्या जीवनात नवे सूर अन नवे तराणे.. नव चैतन्य आणणार.

        या जीवनातील.. भवनातील हे मवाळ सूर आता कायमचे निघून जावोत, हीच प्रार्थना करुन सिद्ध होवू या उद्याच्या मंगलमय.. शुभंकर सूर्योदयासाठी. तो घेऊन येईल आपल्या जीवनात नित्य नूतन 'आनंदी पहाट'.

0 comments:

हिशोब काय ठेवायचा

07:31:00 Nandan Bhalwankar 0 Comments

 काळाच्या निरंतर वाहत्या 

प्रवाहा मध्ये..

आपल्या थोड्या वर्षांचा..

हिशोब काय ठेवायचा ..


आयुष्याने भरभरुन 

दिले असताना..

जे नाही मिळाले त्याचा..

हिशोब काय ठेवायचा..! !


मित्रांनी दिले आहे,

अलोट प्रेम इथे...

तर शत्रूंच्या बोलण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


येणारा प्रत्येक दिवस,

आहे प्रकाशमान इथे..

तर रात्रीच्या अंधाराचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


आनंदाचे दोन क्षण ही,

पुरेसे आहेत जगण्याला..

तर मग उदासीनतेच्या,

क्षणांचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


मधुर आठवणींचे क्षण,

इतके आहेत आयुष्यात..

तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


मिळाली आहेत फुले इथे,

कित्येक सुहृदांकडून..

मग काट्यांच्या टोचणीचा..

हिशोब काय ठेवायचा..!!


चंद्राचा प्रकाश आहे,

जर इतका आल्हाददायक..

तर त्या वर डाग आहे,

ह्याचा हिशोब काय ठेवायचा..!!


जर आठवणीनेच होत असेल,

मन प्रफुल्लित ..

तर भेटण्या न भेटण्याचा,

हिशोब काय ठेवायचा..!!


काही तरी नक्कीच..

खूप चांगलं आहे सगळ्यांमधे..

मग थोड्याशा वाईट पणाचा,

हिशोब काय ठेवायचा..!!

0 comments: